शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शहादा तालुक्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनीच घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले ...

शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले, तालुक्याला एक खासदार व दोन आमदार असतानाही आज तालुक्यातील नागरिक ऑक्सिजन बेड व रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकंती करीत आहेत. लोकप्रतिनिधींचा थेट जनतेशी संपर्क असल्याने प्रशासनाने उपाययोजना करताना लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवला पाहिजे. मात्र असे होत नसल्याने उपायोजना फोल ठरत आहे. परिस्थिती गंभीर झाली असताना अशावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सहभागी करून उपाययोजना राबविल्या पाहिजे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमण झाल्यापासून आतापर्यंत पालकमंत्र्यांनी शहादा तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत एकही बैठक घेतली नाही. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विचार विनिमय केला नाही. यामुळे भविष्यात परिस्थिती गंभीर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहाद्यात ऑक्सिजनचे १०० बेडचे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रकाशा येथे एक हजार बाधितांसाठी विलगीकरण कक्ष केला जाणार आहे. मात्र याला बराच कालावधी लागणार असल्याने आजची परिस्थिती पाहून त्यावर उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शहादा नगरपालिकेमार्फत मंगळवारपासून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. याठिकाणी शहरातील विविध कोविड सेंटरमधील स्थिती, औषध, इंजेक्शनचा साठा व रुग्णवाहिकांबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शहादेकर जनता शहरातील राजकारणीही संयमी आहेत. गेल्या तीन दिवसापासून मयतांची संख्या वाढत असल्याने अमरधाम येथे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत परिसरातील नागरिकांचे वाद निर्माण होत आहेत. या परिसरातील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी तात्काळ दुसरी व्यवस्था करण्यात येईल. यासाठी गॅस दाहिनीचीही व्यवस्था करण्याचा मानस आहे. प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून निर्णय घेत आहेत. शहरात विविध ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहेत. अनेक वसाहतीतील नागरिकांनी स्वतःहून बॅरिकेटींग केले असल्याने रुग्णाला रुग्णालयात नेताना अडचणी निर्माण होत आहे. पालकमंत्र्यांसह प्रशासनाने नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी मांडले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, संतोष वाल्हे आदी उपस्थित होते.