शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

शहादा तालुक्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनीच घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले ...

शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत नगराध्यक्ष पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले, तालुक्याला एक खासदार व दोन आमदार असतानाही आज तालुक्यातील नागरिक ऑक्सिजन बेड व रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकंती करीत आहेत. लोकप्रतिनिधींचा थेट जनतेशी संपर्क असल्याने प्रशासनाने उपाययोजना करताना लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवला पाहिजे. मात्र असे होत नसल्याने उपायोजना फोल ठरत आहे. परिस्थिती गंभीर झाली असताना अशावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सहभागी करून उपाययोजना राबविल्या पाहिजे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमण झाल्यापासून आतापर्यंत पालकमंत्र्यांनी शहादा तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत एकही बैठक घेतली नाही. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विचार विनिमय केला नाही. यामुळे भविष्यात परिस्थिती गंभीर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहाद्यात ऑक्सिजनचे १०० बेडचे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रकाशा येथे एक हजार बाधितांसाठी विलगीकरण कक्ष केला जाणार आहे. मात्र याला बराच कालावधी लागणार असल्याने आजची परिस्थिती पाहून त्यावर उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शहादा नगरपालिकेमार्फत मंगळवारपासून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाणार आहे. याठिकाणी शहरातील विविध कोविड सेंटरमधील स्थिती, औषध, इंजेक्शनचा साठा व रुग्णवाहिकांबाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शहादेकर जनता शहरातील राजकारणीही संयमी आहेत. गेल्या तीन दिवसापासून मयतांची संख्या वाढत असल्याने अमरधाम येथे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत परिसरातील नागरिकांचे वाद निर्माण होत आहेत. या परिसरातील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी तात्काळ दुसरी व्यवस्था करण्यात येईल. यासाठी गॅस दाहिनीचीही व्यवस्था करण्याचा मानस आहे. प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून निर्णय घेत आहेत. शहरात विविध ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहेत. अनेक वसाहतीतील नागरिकांनी स्वतःहून बॅरिकेटींग केले असल्याने रुग्णाला रुग्णालयात नेताना अडचणी निर्माण होत आहे. पालकमंत्र्यांसह प्रशासनाने नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी मांडले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, संतोष वाल्हे आदी उपस्थित होते.