शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांच्या सजगतेने खुर्चीमाळ होते प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खुर्चीमाळ येथे गेल्या आठ दिवसापासून वीजपुरवठा खंडित आहे. खुर्चीमाळ येथे दऱ्या खोºयाच्या डोंगराळ भागातून १८ ते २० किलोमीटर अंतरावरील जमाना सबस्टेशनवरून वीज पुरवठा करण्यात येत असून, कायमच कुठे तरी बिघाड होत असतो व बिघाड झाल्यास गावातीलच दोन तरूण जमाना सबस्टेशनला जाऊन सुचीत करीत असतात. तर दुसरे तरूण बिघाड शोधून दुरूस्ती करीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात.जमाना ऐवजी नवलपूरवरून वीज जोडणी झाल्यास दºया खोºयातील चढउताराचे डोंगराळ भागातील १८ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते दोन किलोमीटर अंतरावर येवून कमी अंतरावरील बिघाड लवकर शोधून विजपुरवठा सुरळीत होईल.जमाना सबस्टेशनवर वीज जोडणी असल्याने माळच्या पाड्यांवर बारा महिन्यात वीज कधी आली तर आली नाहीतर मग कायमच गायब असते. माळ, डोगरीपाडा (माळ), माळ (पाटिलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपाडा (माळ) यांना कायम अंधारातच रहावे लागत असून, बिलिगव्हाणपाडा माळ येथे विजेचे पोल, केबलही अद्यापपर्यत टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे या पाड्यांवर कायम अंधाराचे साम्राज्य आहे.एखाद्या वेळेस गर्भवती महिलेला अथवा रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी मोबाईलची गरज पडते. मात्र विजेअभावी मोबाईल चार्ज नसल्याने मोठी अडचण निर्माण होत असते. अतिदुर्गम भाग असल्याने अस्वल, वाघ या सारख्या जंगली प्राण्यांपासून धोका अधिक आहे. त्यामुळे विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.जमाना सबस्टेशनवरून पाटबारा, ओरपा, डाबोसापडा (ओरपापाडा), नेदवान बुद्रूक अशी करीत दºया खोºयातून १८ ते २० किलोमीटर अंतर करीत खुर्चीमाळ, उबराईपाडा (खुर्चीमाळ), हागोबारपाडा (खुर्चीमाळ), कारभारीपाडा (खुर्चीमाळ) मार्गे वीज येत असल्याने विजेच्या बिघाड शोधण्यासाठी अडचणी निर्माण होत असते. त्यामुळे पुढे खुर्चीमाळहून माळ (पाटीलपाडा), कुंभरीपाडा (माळ), सोजरबारपाडा (माळ), डोंगरीपाडा (माळ), बिलिगव्हाणपडा (माळ) येथेही विजेच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीतच असतो. बिलिगव्हाणपाडा येथे विजेचे खांब व केबलअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झााले आहे. त्यामुळे जमाना सबस्टेशनऐवजी नवलपूर (अलिविहीर) येथे वीज जोडणी झाल्यास १८ किलोमीटरचे अंतर कमी होवून दोन किलोमीटरवर येईल. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.या पाड्यावरील नाागरीकांना विजेअभावी टीव्ही, पिठाची गिरणी व विजेच्या उपकरणाचा उपयोग करता येत नाही. तसेच येथील नागरीकांना अद्यापपर्यत टीव्ही काय आहे हे माहीत नसल्याची खंत व्यक्त करीत व मोबाईल अक्कलकुवा येथे जावून १० रूपये देवून चार्जीग करून घ्यावा लागतो.