शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

आकडेमुक्त गाव संकल्पना अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 11:20 IST

तळोद्यात जनता दरबार : वीज वितरण कंपनीने गावागावात शिबिरे घेण्याची अपेक्षा

ठळक मुद्देऊस जळाल्याच्या घटनेनंतरही तारा अजून ‘जैसे थे’च लोंबकळणा:या तारांमुळे गेल्यावर्षी ऊस जळण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यानंतरही लोंबकळणा:या तारांबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांनी कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तळोदा शिवारातील रोहीत वसोमावल येथील ग्राहकांना हजारोंची वीज बिले तालुक्यातील सोमावल येथील ग्राहकांना मीटर रिडींगचा फटका बसला असल्याची तक्रार वीरसिंग पाडवी यांनी केली होती. जवळपास 30 ते 35 हजार रुपयांची बिले येथील ग्राहकांना आकारण्यात आलेली आहेत. तसे बिलेदेखील अधिका:यांना दाखवि

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वीज वितरण कार्यालयाकडे वीज कनेक्शनसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज दाखल करूनही अजूनपावेतो कार्यवाही केली नसल्याची तक्रार तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांनी प्रत्यक्ष जनता दरबारात केली. त्यामुळे आकडेमुक्त गाव संकल्पना तालुक्यात तरी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. वीज जोडण्यांसाठी अधिका:यांनी गावागावात कॅम्प आयोजित करण्याची मागणीही या वेळी ग्राहकांनी केली आहे. येथील संत सावता माळी भवनात तालुक्यातील वीज समस्यांबाबत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी  होते. याप्रसंगी वीज समस्यांबाबत नागरिकांनी पाढा वाचला. पिंपरपाडा, रतनपाडा, सोरापाडा, रोझवा पुनर्वसन, कालीबेल यासह अनेक गावांमधील ग्राहकांनी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज केलेला आहे. तथापि, त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत कार्यालयातदेखील पाठपुरावा केला आहे. तरीही कुणी लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोपदेखील कुरेसिंग वळवी, लालसिंग वळवी, केलसिंग पावरा यांनी केला. नवीन कनेक्शन देण्यासाठी गावागावात अधिका:यांनी कॅम्प आयोजित करावे, अशी मागणीही या रहिवाशांनी केली. तातडीने कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे यांनी दिल्या. याशिवाय अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेल्या वीजतारा, खांब, नवीन खांब टाकण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली. तेव्हा उपअभियंता सचिन काळे यांनी निधी नसल्यामुळे ही कामे रखडली असून, यासाठी निधीची मागणी डीपीडीसीकडे केल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी कर्मचा:यांअभावी गावक:यांना  तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे कर्मचारी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय चुकीच्या रिडींगमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याचा तक्रारी ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणावर केल्याबाबत संबंधित अधिका:यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या वेळी भामरे           यांनी तातडीने रिडींगबाबत           दुरूस्ती करून सुधारित बिले अदा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आमदार पाडवी यांनी वीज कनेक्शनसाठी तातडीने गावागावात मोहीम हाती घेवून ग्राहकांना मीटर उपलब्ध करून द्यावे. शिवाय नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेले खांब, लोंबकळणा:या तारा व तांत्रिक बिघाडाबाबत ठोस कार्यवाही करण्याची सूचना दिली.सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी तर आभार मधुकर मराठे यांनी मानले. या जनता दरबारास शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे, उपअभियंता सचिन काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र   राजपूत, नगरसेवक अजय परदेशी, विश्वनाथ कलाल, वीरसिंग पाडवी, भास्कर मराठे, संजय कलाल, दाज्या पावरा, अभियंता नीरजकुमार,  अन्सारी, डॉ.स्वप्नील बैसाणे आदींसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाईनमन व नागरिक उपस्थित होते.