शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

आकडेमुक्त गाव संकल्पना अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 11:20 IST

तळोद्यात जनता दरबार : वीज वितरण कंपनीने गावागावात शिबिरे घेण्याची अपेक्षा

ठळक मुद्देऊस जळाल्याच्या घटनेनंतरही तारा अजून ‘जैसे थे’च लोंबकळणा:या तारांमुळे गेल्यावर्षी ऊस जळण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यानंतरही लोंबकळणा:या तारांबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांनी कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तळोदा शिवारातील रोहीत वसोमावल येथील ग्राहकांना हजारोंची वीज बिले तालुक्यातील सोमावल येथील ग्राहकांना मीटर रिडींगचा फटका बसला असल्याची तक्रार वीरसिंग पाडवी यांनी केली होती. जवळपास 30 ते 35 हजार रुपयांची बिले येथील ग्राहकांना आकारण्यात आलेली आहेत. तसे बिलेदेखील अधिका:यांना दाखवि

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वीज वितरण कार्यालयाकडे वीज कनेक्शनसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज दाखल करूनही अजूनपावेतो कार्यवाही केली नसल्याची तक्रार तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांनी प्रत्यक्ष जनता दरबारात केली. त्यामुळे आकडेमुक्त गाव संकल्पना तालुक्यात तरी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. वीज जोडण्यांसाठी अधिका:यांनी गावागावात कॅम्प आयोजित करण्याची मागणीही या वेळी ग्राहकांनी केली आहे. येथील संत सावता माळी भवनात तालुक्यातील वीज समस्यांबाबत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी  होते. याप्रसंगी वीज समस्यांबाबत नागरिकांनी पाढा वाचला. पिंपरपाडा, रतनपाडा, सोरापाडा, रोझवा पुनर्वसन, कालीबेल यासह अनेक गावांमधील ग्राहकांनी वीज कनेक्शनसाठी वीज वितरण कार्यालयाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून अर्ज केलेला आहे. तथापि, त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत कार्यालयातदेखील पाठपुरावा केला आहे. तरीही कुणी लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोपदेखील कुरेसिंग वळवी, लालसिंग वळवी, केलसिंग पावरा यांनी केला. नवीन कनेक्शन देण्यासाठी गावागावात अधिका:यांनी कॅम्प आयोजित करावे, अशी मागणीही या रहिवाशांनी केली. तातडीने कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे यांनी दिल्या. याशिवाय अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेल्या वीजतारा, खांब, नवीन खांब टाकण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली. तेव्हा उपअभियंता सचिन काळे यांनी निधी नसल्यामुळे ही कामे रखडली असून, यासाठी निधीची मागणी डीपीडीसीकडे केल्याचे सांगितले. तसेच काही ठिकाणी कर्मचा:यांअभावी गावक:यांना  तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे कर्मचारी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय चुकीच्या रिडींगमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याचा तक्रारी ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणावर केल्याबाबत संबंधित अधिका:यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या वेळी भामरे           यांनी तातडीने रिडींगबाबत           दुरूस्ती करून सुधारित बिले अदा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आमदार पाडवी यांनी वीज कनेक्शनसाठी तातडीने गावागावात मोहीम हाती घेवून ग्राहकांना मीटर उपलब्ध करून द्यावे. शिवाय नवीन ट्रान्सफार्मर, गंजलेले खांब, लोंबकळणा:या तारा व तांत्रिक बिघाडाबाबत ठोस कार्यवाही करण्याची सूचना दिली.सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी तर आभार मधुकर मराठे यांनी मानले. या जनता दरबारास शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे, उपअभियंता सचिन काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र   राजपूत, नगरसेवक अजय परदेशी, विश्वनाथ कलाल, वीरसिंग पाडवी, भास्कर मराठे, संजय कलाल, दाज्या पावरा, अभियंता नीरजकुमार,  अन्सारी, डॉ.स्वप्नील बैसाणे आदींसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाईनमन व नागरिक उपस्थित होते.