शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

सीसीआयने नंदुरबार जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:32 IST

नंदुरबार : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून चालवण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होणार आहे़ तब्बल ६४ केंद्रांमध्ये ही ...

नंदुरबार : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून चालवण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होणार आहे़ तब्बल ६४ केंद्रांमध्ये ही खरेदी बंद होणार असून जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार येथेही खरेदी थांबवण्यात आली आहे़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र आणि शहादा येथील विविध पाच सूतगिरण्यांमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येतो़ यंदा हंगाम सुरु झाल्यानंतर ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहिर करणाऱ्या सिसीआयकडून कापूस खरेदी सुरु झाली होती़ प्रारंभी खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस दर वाढवल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती़ परंतू डिसेंबरपासून सीसीआयने कापूस खरेदीला वेग दिला होता़ हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दरात कापूस खरेदी करण्याचा सपाटा सीसीआयने लावला होता़ बँक खात्यात रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांनीही कमी भावात का, असेना विश्वसनीय म्हणून कापूस विक्री केली होती़ यातून नंदुरबार केंद्रावर १३ हजार ३५० तर शहादा येथील केंद्रावर २६ हजार क्विंटल कापूस सीसीआयकडून खरेदी करण्यात आला आहे़ ४ मार्च रोजी बाजार बंद झाल्यानंतर मंगळवारी सीसीआयकडून खरेदी होईल अशी अपेक्षा असताना केंंद्र बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर संपूर्ण आठवडाभर हे दोन्ही ठिकाणचे केंद्र बंद होते़ अखेरीस सीसीआयने खरेदी बंद केल्याची माहिती देण्यात आली आहे़नंदुरबार आणि शहादा सह सीसीआयची राज्यात ६२ खरेदी केंद्र आहे़ ही केंद्रेही सोमवारपासून बंद होणार असल्याची माहिती आहे़ सीसीआयकडून हंगाम सुरु होण्यापूर्वी कापूस खरेदी करण्यासाठी गुणवत्तेनुसार हमीभाव ठरवला होता़ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाºया सीसीआयने मेडियम लाँग स्टेपल अर्थात मध्यम आकाराचा धागा निर्माण करणारा कापूस म्हणून महाराष्ट्रातील कापसाची निवड केली होती़ यासाठी ५ हजार १५० ते ५ हजार ३५० प्रतिक्विंटल दर ठरवले होते़ हे दर हमीभावापेक्षा कमीच होते़ प्रामुख्याने राज्यातील शेतकºयांनी यंदा ‘एके वाय १’ या वाणाच्या कापसाची लागवड केली होती़ या कापसातून निघणारा धागा हा साधारणपणे २६़५ ते २७ मिलीमीटरपर्यंतच निघत असल्याने कापूस खरेदी करणाºया खाजगी वस्त्रोद्योगांनी या कापसाच्या खरेदीला नकार दिला होता़ परिणामी हंगामाची पूर्णपणे सांगता न करताच सीसीआयने कापूस खरेदी बंद करत गेल्या सोमवारपासून व्यवहार पूर्णपणे थांबवले होते़ सीसीआयच्या निर्णयामुळे खेडा पद्धतीसह कापूस खरेदी करणारे आणि विविध भागात जिनिंग मिलमधील खाजगी व्यापाºयांना याचा लाभ होऊन त्यांच्याकडून कापसाचे प्रतिक्विंटल दर पाडले जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़