शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने नंदुरबार जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:32 IST

नंदुरबार : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून चालवण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होणार आहे़ तब्बल ६४ केंद्रांमध्ये ही ...

नंदुरबार : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाकडून चालवण्यात येणारे कापूस खरेदी केंद्र सोमवारपासून बंद होणार आहे़ तब्बल ६४ केंद्रांमध्ये ही खरेदी बंद होणार असून जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार येथेही खरेदी थांबवण्यात आली आहे़नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र आणि शहादा येथील विविध पाच सूतगिरण्यांमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी करण्यात येतो़ यंदा हंगाम सुरु झाल्यानंतर ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहिर करणाऱ्या सिसीआयकडून कापूस खरेदी सुरु झाली होती़ प्रारंभी खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस दर वाढवल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती़ परंतू डिसेंबरपासून सीसीआयने कापूस खरेदीला वेग दिला होता़ हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दरात कापूस खरेदी करण्याचा सपाटा सीसीआयने लावला होता़ बँक खात्यात रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांनीही कमी भावात का, असेना विश्वसनीय म्हणून कापूस विक्री केली होती़ यातून नंदुरबार केंद्रावर १३ हजार ३५० तर शहादा येथील केंद्रावर २६ हजार क्विंटल कापूस सीसीआयकडून खरेदी करण्यात आला आहे़ ४ मार्च रोजी बाजार बंद झाल्यानंतर मंगळवारी सीसीआयकडून खरेदी होईल अशी अपेक्षा असताना केंंद्र बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर संपूर्ण आठवडाभर हे दोन्ही ठिकाणचे केंद्र बंद होते़ अखेरीस सीसीआयने खरेदी बंद केल्याची माहिती देण्यात आली आहे़नंदुरबार आणि शहादा सह सीसीआयची राज्यात ६२ खरेदी केंद्र आहे़ ही केंद्रेही सोमवारपासून बंद होणार असल्याची माहिती आहे़ सीसीआयकडून हंगाम सुरु होण्यापूर्वी कापूस खरेदी करण्यासाठी गुणवत्तेनुसार हमीभाव ठरवला होता़ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाºया सीसीआयने मेडियम लाँग स्टेपल अर्थात मध्यम आकाराचा धागा निर्माण करणारा कापूस म्हणून महाराष्ट्रातील कापसाची निवड केली होती़ यासाठी ५ हजार १५० ते ५ हजार ३५० प्रतिक्विंटल दर ठरवले होते़ हे दर हमीभावापेक्षा कमीच होते़ प्रामुख्याने राज्यातील शेतकºयांनी यंदा ‘एके वाय १’ या वाणाच्या कापसाची लागवड केली होती़ या कापसातून निघणारा धागा हा साधारणपणे २६़५ ते २७ मिलीमीटरपर्यंतच निघत असल्याने कापूस खरेदी करणाºया खाजगी वस्त्रोद्योगांनी या कापसाच्या खरेदीला नकार दिला होता़ परिणामी हंगामाची पूर्णपणे सांगता न करताच सीसीआयने कापूस खरेदी बंद करत गेल्या सोमवारपासून व्यवहार पूर्णपणे थांबवले होते़ सीसीआयच्या निर्णयामुळे खेडा पद्धतीसह कापूस खरेदी करणारे आणि विविध भागात जिनिंग मिलमधील खाजगी व्यापाºयांना याचा लाभ होऊन त्यांच्याकडून कापसाचे प्रतिक्विंटल दर पाडले जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़