यावेळी सरपंच जवाहर पाटील, अंगणवाडी सेविका अरुणाबाई पाटील, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास वनपाल दीपक जगदाळे, वनरक्षक प्रवीण वाघ, संतोष राठोड, उपसरपंच गुलसिंग दशरते, सखाराम पाटील, अनिल पाटील, बिलाडीचे पोलीस पाटील गणेश पाटील, कानडीच्या पोलीस पाटील वैशाली पाटील, कुऱ्हावदच्या पोलीस पाटील रेखा कुवर, पोलीस पाटील सुभाष पवार, वसंत पाटील, ग्रामसेवक बी. बी. गिरासे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच जवाहर पाटील म्हणाले की, कोरोना महामारी काळात रुग्णांवर बिकट प्रसंग ओढवला व अनेकांना ऑक्सिजनची गरज भासली. देशभरात त्याचा तुटवडा जाणवल्याने बहुतांश लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी आपल्याला वृक्ष लागवडीचे महत्त्व कळले. आता पुढील पिढीच्या भवितव्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे. ‘एक मूल एक झाड’ याप्रमाणे झाडे लावणे गरजेचे असून, गावातील प्रत्येक कुटुंबाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक वनरक्षक प्रवीण वाघ यांनी केले. सूत्रसंचालन वनपाल दीपक जमदाळे यांनी केले. आभार ग्रामसेवक बी. बी. गिरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बिलाडी त.सा. येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST