शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

तीन शिफ्टमध्ये घेतली जाते काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:42 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वात प्रथम नंदुरबारात होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेची निवड करण्यात आली होती़ येथे ५० खाटांची सर्वात प्रथम सोय होती़ यात वाढ करुन शहरालगतच तीन आणखी कक्ष निर्माण करुन आतापर्यंत १९० जणांवर उपचार झाले आहेत़जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जे़एच़तडवी यांच्या मार्गदर्शनात होळ तर्फे हवेली, पॉलिटेक्निक कॉलेज आणि पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तीन कक्षांची निर्मिती करण्यात आली होती़ एकूण १८० खाटांची सोय याठिकाणी करण्यात आली आहे़ कक्षात आतापर्यंत १९० जणांना आणले गेले होते़ यातील १०८ जण सुखरुप घरी गेले आहेत़ तर ८२ जणांवर येथे उपचार सुरु आहेत़ उपचारांपेक्षा त्यांच्यावर केवळ लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातील बहुतांश जण हे बाहेरगावाहून याठिकाणी आले आहेत़ त्यांना सोशल डिस्टन्सिंगद्वारे अन्नपुरवठा, पाणी देणे तसेच पीपीई कीट परिधान करुन वैद्यकीय अधिकारी माहिती देत आहेत़ २४ तास कक्षात राहणे शक्य नसल्याने मानसिक समस्या येण्याची अडचण लक्षात घेत सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत़ अडचण किंवा शंका असल्यास फोन करुन माहितीचे आदान-प्रदान करण्यावर भर दिला जात आहे़ यातून येथे असलेल्या ८२ जणांना बराच मोठा दिलासा मिळाला आहे़ भेटणारे किंवा बाहेरुन कोणासह परवानगी नसल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान आरोग्य विभागाने विमल विहार या भागात आणखी ३० बेडची क्षमता असलेला कक्ष सुरु केला आहे़ याठिकाणीही क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना आणून ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चार कक्षांसाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक मेडीकल आॅफिसर, एक आरोग्य सेविका व एक एमपीडब्ल्यू यांची नियुक्ती आहे़ आठ तासांच्या सेवेत हे पथक प्रत्येक क्वारंटाईन केलेल्याची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधतात़संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने लहान शहादे आणि ढेकवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे़ हे अधिकारी इंचार्ज म्हणून केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत़तीन कक्षांसाठी विविध विभागाचे कर्मचारी नियुक्त४नंदुरबार शहरातील तीन क्वारंटाईन कक्षांमध्ये महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आदिवासी विकास विभाग यांचे ३१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ हे कर्मचारी सकाळी ९ वाजेपासून येथे हजर होतात़४जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन कक्षांच्या खर्चासाठी ८० लाख रुपयांचा निधी वितरीत केला होता़ यातून सर्व कक्षांमध्ये पंखे, बेड यासह विविध साहित्याची खरेदी करुन ते येथे दाखल असलेल्यांना देण्यात येत आहे़४बाह्य जगासोबत संपर्क तुटला असला तरी कुटूंबासोबत संपर्क ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो़ यातून मानसिक आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले़४क्वारंटाईन कक्ष सुरु असलेल्या सर्व इमारती ह्या प्रामुख्याने शासकीय वसतीगृहे आहेत़ त्यामुळे त्यांचे परत हस्तांतरण करण्यापूर्वी किमान चारवेळा निर्जंतुकीकरण होणार आहे़ चारही ठिकाणी दिवसातून एकवेळा संपूर्ण खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे़