शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन शिफ्टमध्ये घेतली जाते काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:42 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी क्वारंटाईन कक्षांची निर्मिती करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वात प्रथम नंदुरबारात होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेची निवड करण्यात आली होती़ येथे ५० खाटांची सर्वात प्रथम सोय होती़ यात वाढ करुन शहरालगतच तीन आणखी कक्ष निर्माण करुन आतापर्यंत १९० जणांवर उपचार झाले आहेत़जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जे़एच़तडवी यांच्या मार्गदर्शनात होळ तर्फे हवेली, पॉलिटेक्निक कॉलेज आणि पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तीन कक्षांची निर्मिती करण्यात आली होती़ एकूण १८० खाटांची सोय याठिकाणी करण्यात आली आहे़ कक्षात आतापर्यंत १९० जणांना आणले गेले होते़ यातील १०८ जण सुखरुप घरी गेले आहेत़ तर ८२ जणांवर येथे उपचार सुरु आहेत़ उपचारांपेक्षा त्यांच्यावर केवळ लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे़ यातील बहुतांश जण हे बाहेरगावाहून याठिकाणी आले आहेत़ त्यांना सोशल डिस्टन्सिंगद्वारे अन्नपुरवठा, पाणी देणे तसेच पीपीई कीट परिधान करुन वैद्यकीय अधिकारी माहिती देत आहेत़ २४ तास कक्षात राहणे शक्य नसल्याने मानसिक समस्या येण्याची अडचण लक्षात घेत सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत़ अडचण किंवा शंका असल्यास फोन करुन माहितीचे आदान-प्रदान करण्यावर भर दिला जात आहे़ यातून येथे असलेल्या ८२ जणांना बराच मोठा दिलासा मिळाला आहे़ भेटणारे किंवा बाहेरुन कोणासह परवानगी नसल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान आरोग्य विभागाने विमल विहार या भागात आणखी ३० बेडची क्षमता असलेला कक्ष सुरु केला आहे़ याठिकाणीही क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना आणून ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चार कक्षांसाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक मेडीकल आॅफिसर, एक आरोग्य सेविका व एक एमपीडब्ल्यू यांची नियुक्ती आहे़ आठ तासांच्या सेवेत हे पथक प्रत्येक क्वारंटाईन केलेल्याची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधतात़संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने लहान शहादे आणि ढेकवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे़ हे अधिकारी इंचार्ज म्हणून केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत़तीन कक्षांसाठी विविध विभागाचे कर्मचारी नियुक्त४नंदुरबार शहरातील तीन क्वारंटाईन कक्षांमध्ये महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आदिवासी विकास विभाग यांचे ३१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ हे कर्मचारी सकाळी ९ वाजेपासून येथे हजर होतात़४जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन कक्षांच्या खर्चासाठी ८० लाख रुपयांचा निधी वितरीत केला होता़ यातून सर्व कक्षांमध्ये पंखे, बेड यासह विविध साहित्याची खरेदी करुन ते येथे दाखल असलेल्यांना देण्यात येत आहे़४बाह्य जगासोबत संपर्क तुटला असला तरी कुटूंबासोबत संपर्क ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो़ यातून मानसिक आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले़४क्वारंटाईन कक्ष सुरु असलेल्या सर्व इमारती ह्या प्रामुख्याने शासकीय वसतीगृहे आहेत़ त्यामुळे त्यांचे परत हस्तांतरण करण्यापूर्वी किमान चारवेळा निर्जंतुकीकरण होणार आहे़ चारही ठिकाणी दिवसातून एकवेळा संपूर्ण खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे़