शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

नंदुरबारात मंगळवारपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:49 IST

पुन्हा राजकीय धुराळा उडणार : उमेदवार निश्चितीकडे लक्ष, 15 जुलैला मतदान

नंदुरबार : पालिका सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा आताशी कुठे बसला असतांना पुन्हा प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणुकीमुळे धुराळा आणखी उडणार आहे. उद्या, मंगळवार 19 जूनपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास  सुरुवात होणार आहे. त्याआधीच पालिकेतील कथीत भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे महिनाभर राजकीय वातावरण गरम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप गाजले होते. निवडणुकीची राजकीय धग, सत्ता स्थापनेनंतर देखील अर्थात दोन महिन्यापूर्वीर्पयत कायम होती. पालिका सभेतील हाणामारी हे त्याचेच द्योतक होती. त्यानंतर वरवर शांतता दिसून येत असतांना आता पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढणार आहे.रिक्त जागाप्रभाग 16 अ मधून प्रवीण मक्कन चौधरी हे तर याच प्रभागाच्या ब जागेवरून त्यांच्या प}ी रेखाबाई प्रवीण चौधरी निवडून आल्या होत्या. सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातील लढत विशेष गाजली होती. त्यामुळे प्रवीण चौधरी हे नाव पुन्हा चर्चेत आले होते. परंतु दुर्दैवाने निवडणुकीनंतर दोनच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. परिणामी ही जागा रिक्त झाली. शहरातील राजकीय वतरूळात हा मोठा धक्का होता. आता त्याच जागेवर निवडणूक आहे.उद्यापासून अर्ज भरणारपालिका पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, 19 जूनपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. 25 जूनर्पयत अर्ज दाखल करता येणार आहेत. सध्या शिक्षक मतदारसंघाची राजकीय धुमाळी सुरू असतांना त्यातच आता पालिका पोटनिवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी 26 जून रोजी करण्यात येणार आहे.राजकीय प्राबल्यप्रभाग क्रमांक 16 मध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे अर्थात प्रवीण चौधरी यांचे राजकीय प्राबल्य होते. त्यामुळेच दोन्ही पती-प}ी हे तब्बल साडेसहा हजारापेक्षा अधीक मताधिक्यांनी विजयी झाले होते. त्यामुळे या प्रभागात त्यांचेच प्राबल्य कायम राहील किंवा कसे याकडेही लक्ष राहणार आहे. उमेदवारीकडे लक्षदोन्ही पक्षातर्फे उमेदवारी कुणाला दिली जाते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. काँग्रेसतर्फे योगेश चौधरी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे स्व.प्रवीण चौधरी यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते किंवा आणखी दुसरा कोणी उमेदवार दिला जातो याकडे लक्ष लागून आहे. दोन्ही पक्षांनी यापूर्वीच उमेदवारांची चाचपणी करून जवळपास नावे निश्चित करून ठेवले आहेत. आता केवळ घोषणेची औपचारिकता राहणार आहे. 25 जूनर्पयत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे 24 किंवा 25 जून रोजी दोन्ही पक्षातील प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे.भर पावसात प्रचारभर पावसाळ्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे पावसातच प्रचार करावा लागणार आहे. मतदान 15 जुलै रोजी होणार आहे. 25 जूननंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीत झालेल्या अटीतटीचा प्रचार लक्षात घेता या पोटनिवडणुकीत देखील अतीतटीचा प्रचार रंगेल अशी शक्यता आहे. त्यामुळे भर पावसातच दोन्ही पक्ष आणि उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे.प्रशासनाचीही तयारीप्रशासनाने देखील यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रारूप मतदार याद्या तयार करून त्यावर हरकती घेणे, अंतिम मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. आता निवडणूक निर्णय अधिकारी, सहा.अधिकारी यांची नेमणूक करून 19 जूनपासून प्रत्यक्षात निवडणुकीच्या कामाला सुरुवात होणार आहे.शहाद्यात भर दिवसा घरफोडीतिस:यांदा प्रकार : तीन लाख लंपास, भितीचे वातावरणलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील दशरथ नगर मधील रविंद्र अहिरे यांच्या घरी भर दिवसा घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरटय़ांनी  तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सायंकाळी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.      पोलीस सूत्रांनुसार, दोंडाईचा रोडवरील फॉरेस्ट ऑफीस समोरील दशरथ नगरमध्ये रविंद्र सुखदेव अहिरे प्राथमिक शिक्षक आपल्या कुटुंबासह  राहतात . रविंद्र अहिरे यांची पतपेढीची मिटींग होती व दुपारुन मित्राकडे जेवण असल्याने कुटुंबासह ते मित्राकडे गेले होते. मुलगा घरीच होता तो दुपारी 12 वाजेचा सुमारास घरातुन बाहेर पडला. दोन वाजता अहिरे कुटुंब घरी आले असता त्याना   घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेल्या अवस्थेत दिसला. चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले.  कपाटात ठेवलेली रोख एक लाख 80 हजार व दीड लाख रुपये किंमतीच्या पाच तोळे सोन्याचा बांगड्या चोरटय़ांनी लंपास केल्या. चोरटय़ांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला घराचा आतुन दरवाजा लावुन घेतला व मागच्या दाराने पसार झाले व मागचा दाराची कडी देखील बाहेरुन लावली. अहिरे दाम्पत्याने मुलाच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी दीड लाख रुपये आणले होते. सोमवारी ते शुल्क भरण्यासाठी जाणार होते. रविंद्र अहिरे यांच्याकडे चोरीची ही तिसरी घटना आहे. सायंकाळी उशीरापयर्ंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.