शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शहादा आगाराची जयनगरची बस फेरी बंद असल्याने अवैध वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

जयनगर : बऱ्याच दिवसांपासून शहादा आगाराची जयनगरपर्यंतची बसफेरी बंद असल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधून अवैध वाहतूक वाढली आहे. जयनगरसह, कोंढावळ, ...

जयनगर : बऱ्याच दिवसांपासून शहादा आगाराची जयनगरपर्यंतची बसफेरी बंद असल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधून अवैध वाहतूक वाढली आहे. जयनगरसह, कोंढावळ, वडाळी, निंभोरे, धांद्रे, उभादगड, लोंढरे, कहाटूळ या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शहादा या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस नसल्याने आपल्या सोयीनुसार मिळेल त्या वाहनाने जावे लागत आहे. परिणामी अवैध वाहतूक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये शहादा आगाराची बस सुरू न झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर दीड महिन्यापूर्वी शहादा आगाराची बस सुरू झाली होती. मात्र, थोड्याच दिवसात पुन्हा शहादा आगाराने जयनगर येथील बस फेरी बंद केली. जयनगरसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी शहादा जवळ असल्याकारणाने बी-बियाणे व किराणा माल घेण्यासाठी जात असतात. तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात लहान पोरांच्या तब्येतीवर परिणाम होत असतो. त्यांनाही शहादा येथे बाल रुग्णालयात घेऊन जाताना बसेस नसल्याने खूपच त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास शहादा ते जयनगर दरम्यान सर्वच गावांमधील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पूर्वी दिवसाला पाच ते सहावेळा जयनगरपर्यंत शहादा आगारातील बसफेऱ्या लावल्या जात होत्या. मात्र, आता दिवसातून एकही फेरी होत नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बसेस चालू झाल्या आहेत. दोंडाईचा आगारातून सारंगखेडा- जयनगर मार्गे जावदे या गावापर्यंत बस चालू आहे. मात्र, शहादा जाण्यासाठी बसेस नसल्याने येथील नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

ज्यांच्याकडे मोटारसायकल आहे. ते आपल्या मोटारसायकलीने शहादा येथे कामानिमित्त जात असतात. मात्र, ज्या लोकांकडे मोटारसायकल नाही अशा लोकांना अवैध वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. मोटारसायकलवाल्यांनाही पेट्रोलचे भाव खूपच वाढल्याने नेहमी मोटारसायकलने जाणे परवडत नाही. याचा फायदा घेत अवैध वाहतूकवाले मनमानी भाडे आकारत असल्याचे निदर्शनास येत आहे.

विद्यार्थ्यांना भुर्दंड

दरवर्षी दहावीचा निकाल घोषित झाल्यावर विद्यार्थी शहादा येथे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच डोमिसाईलचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शहादा सेतू केंद्रात जात असतात. मात्र, बस फेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना शहादा येथे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. सोबत ग्रामस्थांनाही शासकीय कार्यालयात अथवा बँकेत पीककर्ज काढण्यासाठी शहादा येथे जाण्यासाठी अवैध वाहतुकीशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव अवैध वाहतूकवाल्यांच्या मनमानीनुसार भाडे द्यावे लागत आहे. एकंदरीत जोपर्यंत शासनाच्या बसेस बंद आहेत, तोपर्यंत खासगी वाहतुकीमुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी शहादा आगारातून दिवसातून निदान दोन ते तीन फेऱ्या तरी जयनगरपर्यंतच्या सुरू करायला हव्यात, अशी मागणी शहादा ते जयनगर मार्गावरील ग्रामस्थांनी केली आहे.