शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहादा आगाराची जयनगरची बस फेरी बंद असल्याने अवैध वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

जयनगर : बऱ्याच दिवसांपासून शहादा आगाराची जयनगरपर्यंतची बसफेरी बंद असल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधून अवैध वाहतूक वाढली आहे. जयनगरसह, कोंढावळ, ...

जयनगर : बऱ्याच दिवसांपासून शहादा आगाराची जयनगरपर्यंतची बसफेरी बंद असल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधून अवैध वाहतूक वाढली आहे. जयनगरसह, कोंढावळ, वडाळी, निंभोरे, धांद्रे, उभादगड, लोंढरे, कहाटूळ या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शहादा या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस नसल्याने आपल्या सोयीनुसार मिळेल त्या वाहनाने जावे लागत आहे. परिणामी अवैध वाहतूक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये शहादा आगाराची बस सुरू न झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर दीड महिन्यापूर्वी शहादा आगाराची बस सुरू झाली होती. मात्र, थोड्याच दिवसात पुन्हा शहादा आगाराने जयनगर येथील बस फेरी बंद केली. जयनगरसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी शहादा जवळ असल्याकारणाने बी-बियाणे व किराणा माल घेण्यासाठी जात असतात. तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात लहान पोरांच्या तब्येतीवर परिणाम होत असतो. त्यांनाही शहादा येथे बाल रुग्णालयात घेऊन जाताना बसेस नसल्याने खूपच त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास शहादा ते जयनगर दरम्यान सर्वच गावांमधील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पूर्वी दिवसाला पाच ते सहावेळा जयनगरपर्यंत शहादा आगारातील बसफेऱ्या लावल्या जात होत्या. मात्र, आता दिवसातून एकही फेरी होत नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बसेस चालू झाल्या आहेत. दोंडाईचा आगारातून सारंगखेडा- जयनगर मार्गे जावदे या गावापर्यंत बस चालू आहे. मात्र, शहादा जाण्यासाठी बसेस नसल्याने येथील नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

ज्यांच्याकडे मोटारसायकल आहे. ते आपल्या मोटारसायकलीने शहादा येथे कामानिमित्त जात असतात. मात्र, ज्या लोकांकडे मोटारसायकल नाही अशा लोकांना अवैध वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. मोटारसायकलवाल्यांनाही पेट्रोलचे भाव खूपच वाढल्याने नेहमी मोटारसायकलने जाणे परवडत नाही. याचा फायदा घेत अवैध वाहतूकवाले मनमानी भाडे आकारत असल्याचे निदर्शनास येत आहे.

विद्यार्थ्यांना भुर्दंड

दरवर्षी दहावीचा निकाल घोषित झाल्यावर विद्यार्थी शहादा येथे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच डोमिसाईलचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शहादा सेतू केंद्रात जात असतात. मात्र, बस फेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना शहादा येथे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. सोबत ग्रामस्थांनाही शासकीय कार्यालयात अथवा बँकेत पीककर्ज काढण्यासाठी शहादा येथे जाण्यासाठी अवैध वाहतुकीशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव अवैध वाहतूकवाल्यांच्या मनमानीनुसार भाडे द्यावे लागत आहे. एकंदरीत जोपर्यंत शासनाच्या बसेस बंद आहेत, तोपर्यंत खासगी वाहतुकीमुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी शहादा आगारातून दिवसातून निदान दोन ते तीन फेऱ्या तरी जयनगरपर्यंतच्या सुरू करायला हव्यात, अशी मागणी शहादा ते जयनगर मार्गावरील ग्रामस्थांनी केली आहे.