शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

‘नफरत की आग मे मेरा शहर जला..’

By admin | Updated: June 16, 2017 13:19 IST

पोलिसांची ढिलाई : शहाद्यातील खून राजकीय वैमनस्यातूनच

रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत 

शहादा,दि.16- ‘नफरत की आग मे मेरा शहर जला, अपनो ने अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’ शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील महिलेची ही प्रतिक्रिया सुन्न करणारी आहे. पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा खून आणि त्यानंतर तब्बल 24 तास शहरात सुरू असलेली जाळपोळीने सारी गरीब-नवाज कॉलनी हादरली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमनस्यातूनच घडल्याची प्रतिक्रिया असून पोलिसांनी सुरुवातीलाच या दोन्ही गटातील वादाकडे गांभीर्याने लक्ष न घातल्यानेच घटना घडल्याचे बोलले जात आहे.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनी म्हणजे शहरातील भव्य विस्तारीत वसाहत. जवळपास शहरातील 30 टक्केपेक्षा अधिक भाग या वसाहतीत येतो. मुस्लीमबहुल वस्तीचा हा परिसर असून पालिका निवडणुकीपासून हा भाग अधिक चर्चेत आला. पालिका निवडणुकीतच याठिकाणी काँग्रेस आणि एमआयएममध्ये चुरशीची लढत झाली. याच चुरशीचे पडसाद गेले आठ महिने दोन्ही गटात वेळोवेळी उमटत आले. नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी असो की एमआयएमची आभार सभा असो. या दोन्ही  गटातील वाद उफाळून आले. हाणामारीच्या  व दगडफेकीच्या घटना घडल्या. पण त्यावेळी केवळ समझोत्याची भूमिका त्या त्या पक्षाचे म्होरके म्हणा की पोलीस म्हणा यांनी घेतली. पण त्या समझोत्यातून वैमनस्य संपले नव्हते. 14 जूनला हे वैमनस्य क्षुल्लक कारणावरून उफाळून आले आणि त्याचा परिणाम बांधकाम सभापतीच्या खुनात झाला. या खुनानंतर मात्र दुस:या गटातील वैमनस्याची भावना अधिक पेटली आणि त्यातून घरांची, दुकानांची जाळपोळ, लुटालूट सुरू झाली.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील गेले 24 तास म्हणजे अक्षरश: युद्ध भूमी बनली होती. रॉकेल-पेट्रोलचे बॉम्ब, दगड-विटा, धारदार शस्त्रे घेऊन समाजकंटक राजरोसपणे काही निवडक घरे व दुकाने जाळत होते. 50 ते 100 युवकांची टोळी सातत्याने हेच           काम करीत होते. बुधवारच्या  घटनेनंतर गुरुवारीदेखील दुपार्पयत तोंडावर कपडे बांधून काही  युवकांनी जाळपोळ करून नंगानाच केला.
गेल्या 24 तासात गरीब-नवाज कॉलनीतील 25 पेक्षा अधिक घरे जाळण्यात आली. दोन कार, दोन ट्रॅक्टर, मोटारसायकलीही जाळण्यात आल्या. दुकाने आणि गोडावूनचीही नासधूस करण्यात आली. जी घरे जाळली त्या घरात कुठलाही सामान शिल्लक राहिला नाही. गुरुवारी दुपारी जेव्हा या परिसरात भेट दिली त्यावेळी जाळलेल्या घरांमध्ये लहान-लहान मुले तेथील भंगार गोळा करीत होते. एकूणच शहाद्यातील ही घटना खरोखरच सुन्न करणारी आहे.
यासंदर्भात या परिसरात फेरफटका मारला असता टोळक्या-टोळक्याने लोक जमा झालेले दिसले. महिलादेखील समूहातच होत्या. घडलेल्या घटनेबाबत कोणीही काही बोलायला तयार नव्हते. सारे काही अबोल झाल्यागत स्थिती होती. प्रचंड दहशत या भागातील लोकांमध्ये दिसून आली. या वसाहतीत  बसलेल्या एका महिलांच्या समूहाशी चर्चा केली असता कुणी काही बोलले नाही पण एका महिलेने सहजपणे उद्गारलेले शब्द मात्र खरोखरच सर्व हकीगत सांगणारे ठरले. ‘नफरत की आग मे सारा शहर जला, अपनोनेही अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’