शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘नफरत की आग मे मेरा शहर जला..’

By admin | Updated: June 16, 2017 13:19 IST

पोलिसांची ढिलाई : शहाद्यातील खून राजकीय वैमनस्यातूनच

रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत 

शहादा,दि.16- ‘नफरत की आग मे मेरा शहर जला, अपनो ने अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’ शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील महिलेची ही प्रतिक्रिया सुन्न करणारी आहे. पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा खून आणि त्यानंतर तब्बल 24 तास शहरात सुरू असलेली जाळपोळीने सारी गरीब-नवाज कॉलनी हादरली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमनस्यातूनच घडल्याची प्रतिक्रिया असून पोलिसांनी सुरुवातीलाच या दोन्ही गटातील वादाकडे गांभीर्याने लक्ष न घातल्यानेच घटना घडल्याचे बोलले जात आहे.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनी म्हणजे शहरातील भव्य विस्तारीत वसाहत. जवळपास शहरातील 30 टक्केपेक्षा अधिक भाग या वसाहतीत येतो. मुस्लीमबहुल वस्तीचा हा परिसर असून पालिका निवडणुकीपासून हा भाग अधिक चर्चेत आला. पालिका निवडणुकीतच याठिकाणी काँग्रेस आणि एमआयएममध्ये चुरशीची लढत झाली. याच चुरशीचे पडसाद गेले आठ महिने दोन्ही गटात वेळोवेळी उमटत आले. नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी असो की एमआयएमची आभार सभा असो. या दोन्ही  गटातील वाद उफाळून आले. हाणामारीच्या  व दगडफेकीच्या घटना घडल्या. पण त्यावेळी केवळ समझोत्याची भूमिका त्या त्या पक्षाचे म्होरके म्हणा की पोलीस म्हणा यांनी घेतली. पण त्या समझोत्यातून वैमनस्य संपले नव्हते. 14 जूनला हे वैमनस्य क्षुल्लक कारणावरून उफाळून आले आणि त्याचा परिणाम बांधकाम सभापतीच्या खुनात झाला. या खुनानंतर मात्र दुस:या गटातील वैमनस्याची भावना अधिक पेटली आणि त्यातून घरांची, दुकानांची जाळपोळ, लुटालूट सुरू झाली.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील गेले 24 तास म्हणजे अक्षरश: युद्ध भूमी बनली होती. रॉकेल-पेट्रोलचे बॉम्ब, दगड-विटा, धारदार शस्त्रे घेऊन समाजकंटक राजरोसपणे काही निवडक घरे व दुकाने जाळत होते. 50 ते 100 युवकांची टोळी सातत्याने हेच           काम करीत होते. बुधवारच्या  घटनेनंतर गुरुवारीदेखील दुपार्पयत तोंडावर कपडे बांधून काही  युवकांनी जाळपोळ करून नंगानाच केला.
गेल्या 24 तासात गरीब-नवाज कॉलनीतील 25 पेक्षा अधिक घरे जाळण्यात आली. दोन कार, दोन ट्रॅक्टर, मोटारसायकलीही जाळण्यात आल्या. दुकाने आणि गोडावूनचीही नासधूस करण्यात आली. जी घरे जाळली त्या घरात कुठलाही सामान शिल्लक राहिला नाही. गुरुवारी दुपारी जेव्हा या परिसरात भेट दिली त्यावेळी जाळलेल्या घरांमध्ये लहान-लहान मुले तेथील भंगार गोळा करीत होते. एकूणच शहाद्यातील ही घटना खरोखरच सुन्न करणारी आहे.
यासंदर्भात या परिसरात फेरफटका मारला असता टोळक्या-टोळक्याने लोक जमा झालेले दिसले. महिलादेखील समूहातच होत्या. घडलेल्या घटनेबाबत कोणीही काही बोलायला तयार नव्हते. सारे काही अबोल झाल्यागत स्थिती होती. प्रचंड दहशत या भागातील लोकांमध्ये दिसून आली. या वसाहतीत  बसलेल्या एका महिलांच्या समूहाशी चर्चा केली असता कुणी काही बोलले नाही पण एका महिलेने सहजपणे उद्गारलेले शब्द मात्र खरोखरच सर्व हकीगत सांगणारे ठरले. ‘नफरत की आग मे सारा शहर जला, अपनोनेही अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’