शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘नफरत की आग मे मेरा शहर जला..’

By admin | Updated: June 16, 2017 13:19 IST

पोलिसांची ढिलाई : शहाद्यातील खून राजकीय वैमनस्यातूनच

रमाकांत पाटील/ ऑनलाईन लोकमत 

शहादा,दि.16- ‘नफरत की आग मे मेरा शहर जला, अपनो ने अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’ शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील महिलेची ही प्रतिक्रिया सुन्न करणारी आहे. पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा खून आणि त्यानंतर तब्बल 24 तास शहरात सुरू असलेली जाळपोळीने सारी गरीब-नवाज कॉलनी हादरली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमनस्यातूनच घडल्याची प्रतिक्रिया असून पोलिसांनी सुरुवातीलाच या दोन्ही गटातील वादाकडे गांभीर्याने लक्ष न घातल्यानेच घटना घडल्याचे बोलले जात आहे.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनी म्हणजे शहरातील भव्य विस्तारीत वसाहत. जवळपास शहरातील 30 टक्केपेक्षा अधिक भाग या वसाहतीत येतो. मुस्लीमबहुल वस्तीचा हा परिसर असून पालिका निवडणुकीपासून हा भाग अधिक चर्चेत आला. पालिका निवडणुकीतच याठिकाणी काँग्रेस आणि एमआयएममध्ये चुरशीची लढत झाली. याच चुरशीचे पडसाद गेले आठ महिने दोन्ही गटात वेळोवेळी उमटत आले. नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी असो की एमआयएमची आभार सभा असो. या दोन्ही  गटातील वाद उफाळून आले. हाणामारीच्या  व दगडफेकीच्या घटना घडल्या. पण त्यावेळी केवळ समझोत्याची भूमिका त्या त्या पक्षाचे म्होरके म्हणा की पोलीस म्हणा यांनी घेतली. पण त्या समझोत्यातून वैमनस्य संपले नव्हते. 14 जूनला हे वैमनस्य क्षुल्लक कारणावरून उफाळून आले आणि त्याचा परिणाम बांधकाम सभापतीच्या खुनात झाला. या खुनानंतर मात्र दुस:या गटातील वैमनस्याची भावना अधिक पेटली आणि त्यातून घरांची, दुकानांची जाळपोळ, लुटालूट सुरू झाली.
शहाद्यातील गरीब-नवाज कॉलनीतील गेले 24 तास म्हणजे अक्षरश: युद्ध भूमी बनली होती. रॉकेल-पेट्रोलचे बॉम्ब, दगड-विटा, धारदार शस्त्रे घेऊन समाजकंटक राजरोसपणे काही निवडक घरे व दुकाने जाळत होते. 50 ते 100 युवकांची टोळी सातत्याने हेच           काम करीत होते. बुधवारच्या  घटनेनंतर गुरुवारीदेखील दुपार्पयत तोंडावर कपडे बांधून काही  युवकांनी जाळपोळ करून नंगानाच केला.
गेल्या 24 तासात गरीब-नवाज कॉलनीतील 25 पेक्षा अधिक घरे जाळण्यात आली. दोन कार, दोन ट्रॅक्टर, मोटारसायकलीही जाळण्यात आल्या. दुकाने आणि गोडावूनचीही नासधूस करण्यात आली. जी घरे जाळली त्या घरात कुठलाही सामान शिल्लक राहिला नाही. गुरुवारी दुपारी जेव्हा या परिसरात भेट दिली त्यावेळी जाळलेल्या घरांमध्ये लहान-लहान मुले तेथील भंगार गोळा करीत होते. एकूणच शहाद्यातील ही घटना खरोखरच सुन्न करणारी आहे.
यासंदर्भात या परिसरात फेरफटका मारला असता टोळक्या-टोळक्याने लोक जमा झालेले दिसले. महिलादेखील समूहातच होत्या. घडलेल्या घटनेबाबत कोणीही काही बोलायला तयार नव्हते. सारे काही अबोल झाल्यागत स्थिती होती. प्रचंड दहशत या भागातील लोकांमध्ये दिसून आली. या वसाहतीत  बसलेल्या एका महिलांच्या समूहाशी चर्चा केली असता कुणी काही बोलले नाही पण एका महिलेने सहजपणे उद्गारलेले शब्द मात्र खरोखरच सर्व हकीगत सांगणारे ठरले. ‘नफरत की आग मे सारा शहर जला, अपनोनेही अपनो को लूटा, किसका क्या गया भला..’