शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:51 IST

लाखो रुपयांचा खर्च वाया : जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ परिसरात शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले केटीवेअर बंधारे पाटय़ांअभावी निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांच्या पाणी अडविण्यासाठी लागणा:या लोखंडी पाटय़ा चोरीला गेल्याने पाणी साठवता येत नाही. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असून  पावसाचे पाणी वाहून जात असल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यातील कोंढावळ, जयनगर, उभादगड बोराळा, कुकावल, कोठली  वडाळी परिसरात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र बंधा:यांमध्ये पाणी साठवण्यासाठी लागणा:या पाटय़ाच गायब झाल्याने सद्यस्थितीत हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे शेतक:यांनी केली. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात हे बंधारे कोरडेठाक झाले आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाची ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना फक्त कागदावरच मर्यादित असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतक:यांना खरीपासह रब्बी व उन्हाळी पिके घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या बंधा:यांमध्ये जर पुरेसा पाणीसाठा झाला तर परिसरातील जमिनीत जलपातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. परंतु बंधा:यांमध्ये पाणीसाठाच होत नसल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल जात आहे.यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेनुसार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामासाठी टाकलेला पैसा निघेल की नाही याबाबत शाश्वती नाही. किमान या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकून पाणी अडवले गेले तर रब्बी हंगामाला तरी फायदा होऊन पिके घेतात येतील, अशी आशा शेतक:यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तुटलेले व नादुरुस्त बंधारे आणि पाटय़ा नसलेल्या बंधा:यांचा सव्रे करून त्यांची दुरुस्ती व पाटय़ा टाकण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.