शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:51 IST

लाखो रुपयांचा खर्च वाया : जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ परिसरात शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले केटीवेअर बंधारे पाटय़ांअभावी निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांच्या पाणी अडविण्यासाठी लागणा:या लोखंडी पाटय़ा चोरीला गेल्याने पाणी साठवता येत नाही. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असून  पावसाचे पाणी वाहून जात असल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यातील कोंढावळ, जयनगर, उभादगड बोराळा, कुकावल, कोठली  वडाळी परिसरात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र बंधा:यांमध्ये पाणी साठवण्यासाठी लागणा:या पाटय़ाच गायब झाल्याने सद्यस्थितीत हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे शेतक:यांनी केली. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात हे बंधारे कोरडेठाक झाले आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाची ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना फक्त कागदावरच मर्यादित असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतक:यांना खरीपासह रब्बी व उन्हाळी पिके घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या बंधा:यांमध्ये जर पुरेसा पाणीसाठा झाला तर परिसरातील जमिनीत जलपातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. परंतु बंधा:यांमध्ये पाणीसाठाच होत नसल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल जात आहे.यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेनुसार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामासाठी टाकलेला पैसा निघेल की नाही याबाबत शाश्वती नाही. किमान या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकून पाणी अडवले गेले तर रब्बी हंगामाला तरी फायदा होऊन पिके घेतात येतील, अशी आशा शेतक:यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तुटलेले व नादुरुस्त बंधारे आणि पाटय़ा नसलेल्या बंधा:यांचा सव्रे करून त्यांची दुरुस्ती व पाटय़ा टाकण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.