शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पाटय़ांअभावी बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:51 IST

लाखो रुपयांचा खर्च वाया : जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढावळ : शहादा तालुक्यातील कोंढावळ परिसरात शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले केटीवेअर बंधारे पाटय़ांअभावी निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांच्या पाणी अडविण्यासाठी लागणा:या लोखंडी पाटय़ा चोरीला गेल्याने पाणी साठवता येत नाही. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले असून  पावसाचे पाणी वाहून जात असल्याने शेतक:यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.शहादा तालुक्यातील कोंढावळ, जयनगर, उभादगड बोराळा, कुकावल, कोठली  वडाळी परिसरात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र बंधा:यांमध्ये पाणी साठवण्यासाठी लागणा:या पाटय़ाच गायब झाल्याने सद्यस्थितीत हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे शेतक:यांनी केली. मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात हे बंधारे कोरडेठाक झाले आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाची ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना फक्त कागदावरच मर्यादित असल्याचा आरोप शेतक:यांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतक:यांना खरीपासह रब्बी व उन्हाळी पिके घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या बंधा:यांमध्ये जर पुरेसा पाणीसाठा झाला तर परिसरातील जमिनीत जलपातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. परंतु बंधा:यांमध्ये पाणीसाठाच होत नसल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खोल जात आहे.यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेनुसार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामासाठी टाकलेला पैसा निघेल की नाही याबाबत शाश्वती नाही. किमान या बंधा:यांमध्ये पाटय़ा टाकून पाणी अडवले गेले तर रब्बी हंगामाला तरी फायदा होऊन पिके घेतात येतील, अशी आशा शेतक:यांना आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तुटलेले व नादुरुस्त बंधारे आणि पाटय़ा नसलेल्या बंधा:यांचा सव्रे करून त्यांची दुरुस्ती व पाटय़ा टाकण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.