शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

५९ घरांवर चालणार बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील देवळीफळी व इस्लामपुरा भागातील एकूण ५९ घरांवर काही दिवसात बुलडोजर चालवले जाणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील देवळीफळी व इस्लामपुरा भागातील एकूण ५९ घरांवर काही दिवसात बुलडोजर चालवले जाणार आहे. ५९ घरे विस्थापित करून शहरातदेखील महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही दिवसात सुरू करण्यात येणार असून, सध्या उपजिल्हा रुग्णालयानजीक कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीने लवकरात लवकर महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दोन वर्षांपासून वाहनधारकांचे हालकाही भागात राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या कामाला गती मिळत असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे.ब्रिटिशकालीन पूल जीर्णतालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाले असून, या पुलांवर अनेक अपघात होत असल्याने पुलांच्या कामांनादेखील गती देण्यात आली आहे. कोंडाईबारी घाटातील पूल, रायंगण पूल, रंगावली पूल व वाकीपाडा पूल जीर्ण झाले आहेत. त्यामुळे नवीन कामांनादेखील नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.पुलामुळे शहराचे दोन भाग नाहीनवापूर शहरातील नागरिकांची महामार्ग निर्माण करताना शहरातून पूल न घेता केवळ चौपदरीकरण व सर्व्हिस रोड तयार करावा तसेच गुजरात राज्यातील सोनगड शहराचे महामार्गावरील ब्रीजमुळे दोन भाग पडले आहेत, तसे नवापुरात होणार नाही. पिंपळनेर चौफुलीजवळील शेतातून रंगावली नदीवरील पूल देवळफळीपर्यंत राहणार आहे. साधारण २५ स्तंभांचा हा पूल असणार आहे. देवळीफळीत एमआयडीसीकडे जाण्यासाठी एक बोगदा ठेवण्यात आला आहे. हा पूल देवळफळीत संपले, अशी माहिती प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवेशद्वार सर्वाधिक सुंदर व आकर्षकजे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर राजेश म्हात्रे यांनी माहिती दिली. नवापूर शहरातील स्व. हेमलता वळवी यांच्या पुतळ्याजवळ मोठे जंक्शन येणार असून, ते सर्वाधिक सुंदर व आकर्षक बवण्यात येणार आहे. रंगावली नदीवरून देवळफळीपर्यंत नवीन महामार्ग कसा असणार आहे याचे लेआऊट कंपनीने दिले आहे. तर नवापूर शहरातील प्रवेशद्वाराजवळ कसा महामार्ग असणार यांचादेखील प्लान दिला आहे.ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल कच्च्या आणि पक्क्या मालाची ने-आण जरी या प्रकल्पाच्या निमित्ताने अधिक वेगवान झाली आणि स्थलांतराचा प्रश्न जरी अंशतः मार्गी लागला तरी आज ज्या नागरी सुविधा मोठ्या शहरांमध्ये अगदी सहज मिळतात त्या जर या महामार्गानजीकच्या भागातील लोकांनाही मिळू लागल्या तर आजच्या घडीला ग्रामीण भागातून शहरात होणारे आदिवासीबहुल भागातील स्थलांतरेसुद्धा कमी होतील. दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांवरील ७० टक्के काम पूर्ण