शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

बीएसएनएलची सेवा 15 दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेली ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मोबाईल सेवेसह दूरध्वनी सेवाही ठप्प झाल्याने तालुक्यातील जनतेचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.अक्कलकुवा तालुक्यात एक हजारावर बीएसएनएलचे दूरध्वनी ग्राहक आहेत त्यातील बहुसंख्य ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही सेवा पूर्णत: बंद असल्याने त्यांचे व्यवसाय पूर्णत: बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  बीएसएनएलच्या कनेक्टीव्हीटीअभावी स्टेट बँक, सेंट्रल बैंक, जिल्हा मध्यवर्ती बँक, टपाल कार्यालय, सायबर सेवा आदींचे कामकाज ठप्प पडल्यामुळे जनतेच्या अत्यावश्यक गरजा प्रभावित झाल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थी पोर्टलवरील माहिती भरणे या सर्व गोष्टींवर परिणाम झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने जनतेत या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचे हालशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व विविध शासकीय दाखले ऑनलाईन मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खापर किंवा अक्कलकुवा येथे येतात. मात्र कनेक्टीव्हीटीअभावी कामे होत नसल्याने त्यांना दररोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासाचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.अक्कलकुवा येथील कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी रहात नसल्याने तक्रार कोणाकडे करावी हा कायमचा प्रश्न आहे. ब:याचा           तळोदा कार्यालयात तक्रार करावी लागते. त्याचप्रमाणे अक्कलकुवा, खापर व मोलगी येथील ऑपरेटर नसल्याने तेथे तात्पुरते नेमण्यात आलेले अकुशल कामगारांना दूरध्वनीचा बिघाड दुरूस्त करणे जमत नाही. त्यामुळे ग्राहकांची परवड होत आहे. त्या ऑपरेटर्सना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळेही सेवेत व्यतय येत असल्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात विजेचा लपंडाव हा नेहमीचा असून तास दोन तास वीजपुरवठा बंद पडल्यास बीएसएनएलची सेवा बंद पडते. बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असलेल्या जनरेटरचा वापर केला जात नसून जनरेटर केवळ ‘शो-पीस’ झालेले आहेत. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत असून 15 दिवसांपासून सेवा बंद असूनही वरिष्ठ लक्ष देत नसल्याने जनतेने तक्रार कुठे           करावी? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असून वरिष्ठांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.