शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

हजारोंच्या उपस्थितीत शहिदांच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तालुक्यातील रावलापाणी येथे शहीद झालेल्या आदिवासी शहीदांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तालुक्यातील रावलापाणी येथे शहीद झालेल्या आदिवासी शहीदांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी गुजरात, मध्यप्रदेशासह जिल्ह्यातील साधारण सात हजार आदिवासींनी सुमारे सात-आठ किलोमीटरचा डोंगर चढत आपल्या स्वातंत्र्य विरांच्या स्मृती जागविल्या होत्या. दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने तेथे इतिहास प्रेमिंनी हजेरी लावलेली असतांना प्रशासनाकडून कुठलीच सुविधा नसल्याने प्रशासनाच्या उदासिनते विषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी २ मार्च १९४३ ला तळोद्या नजिक असलेल्या रावलापाणीच्या जंगलात निझरा नदीच्या तिरी ब्रिटीशांविरोधात तिव्र आंदोलन केले होते. त्यामुळे ब्रिटीश सैनिकांनी आदिवासींचे हे स्वातंत्र्य चळवयीचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी गोळीबार केला होता. त्यात १५ आदिवासी शहीद झाले होते. तथापि आदिवासींचा इतिहास उजेडात आला नाही. तेथील खडकावर गोळीबाराच्या खुना आजही शाबूत आहेत. आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी व्हावा यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मोरवड, ता.तळोदा येथील संत गुलाम महाराजांच्या आप समाजातर्फे दरवर्षी रावलापाणी येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही सोमवारी सकाळी श्रद्धांजली व आरती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.कार्यक्रमास शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती भागातील इतिहासप्रेमींबरोबरच नाशिक, मालेगाव, साक्री, चोपडा व तळोदा तालुक्यातील आदिवासींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. याप्रसंगी शहिदांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटीया यांनी रावलापाणीच्या स्वातंत्र्य संग्रामाची माहिती करून देत याठिकाणी आदिवासींनी ब्रिटिशांविरोधात कशी चळवळ उभारली होती त्याचे विवेचन केले होते.आता शासनाने येथील स्मारकाच्या विकासासाठी ठोस गतीने प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर गुलाम बाबांचे अनुयायी लक्ष्मण महाराज यांनी बाबांचा व्यसनमुक्तीचा संदेश वाचून दाखविला. युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या पार्वताबाई गावीत, भरत पवार, माजी सभापती जितेंद्र पाडवी, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, सरपंच गोपी पावरा, माजी सरपंच नारायण ठाकरे, पोलीस पाटील अशोक पाटील, प्रेम पाडवी उपस्थित होते.स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या आदिवासी क्रांती कारकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी रावलापाणी येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. यंदाही अशा कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हजारो आदिवासींनी जिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातून हजेरी लावली होती, तेही मोठ्या संख्येने. मात्र श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचा विसर प्रशासनाला पडला की काय जिलञहा अथवा तालुकास्तरावरील कुणीही अधिकारी, कर्मचारी तेथे फिरकलेच नाही. एवढेच नव्हे तर साधी व्यवस्थादेखील करण्यात आली नाही. प्रशासनाच्या अशा उदासीनतेबाबत इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विशेषत: गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांच्या स्मृती जागविल्या होत्याचे म्हटले जात होते. त्याच बरोबर संबंधीत यंत्रणेनेदेखील रावलापाणीच्या स्मारकाच्या विकास कामांना गती द्यावी, अशी मागणीदेखील पर्यकांनी केली आहे.