शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकासाठी लाभाथ्र्याचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लाभाथ्र्याना विविध योजनांच्या लाभासाठी तर विद्याथ्र्याना दाखल्यांच्या पूर्ततेकरीता शिधा पत्रिकांची अत्यंत आवश्यकता भासत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लाभाथ्र्याना विविध योजनांच्या लाभासाठी तर विद्याथ्र्याना दाखल्यांच्या पूर्ततेकरीता शिधा पत्रिकांची अत्यंत आवश्यकता भासत असून, या शिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधीत पुरवठा शाखेकडे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र एवढे करूनही त्यांना निराश होऊन परतावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. दरम्यान प्रशासनाकडेदेखील मोठय़ा प्रमाणात रेशनकार्ड स्वाक्षरी अभावी पडून असल्याचे लाभाथ्र्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्याथ्र्याच्या पुढील प्रवेशाच्या पाश्र्वभूमिवर तातडीने शिधापत्रिका द्याव्यात अशी मागणी आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबरोबरच विद्याथ्र्याच्या उत्पन्न व जातीच्या दाखल्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकांची आवश्यकता असते. तथापि या शिधापत्रिकाच जवळ नसल्यामुळे नाईलाजास्तव कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य झाले आहे. परिणामी नागरिकांना योजनांपासून वंचित  राहावे लागत आहे. वास्तविक गेल्या अनेक महिन्यांपासून लाभार्थी व पालकांनी नवीन रेशनकार्ड व दुय्यम कार्डासाठी संबंधीत पुरवठा        शाखेकडे प्रकरणे दाखल केली आहेत. मात्र त्यांना तत्काळ मिळण्याऐवजी अजूनही प्राप्त झालेली नाही. कार्डाकरीता रोजच हे लाभार्थी खेडय़ावरून येवून संबंधीतांकडे थेटे घालत आहेत. त्यांना उद्या या, पर्वा या, साहेबांची स्वाक्षरी बाकी आहे, असे उत्तरे मिळत असतात. त्यामुळे हेलपाटे मारून लाभार्थी अक्षरश: वैतागले आहेत. आधीच  तीन ते चार महिन्यांपासून पुरवठा शाखेकडे शिधापत्रिकांची वानवा होती. विशेषत: केशरी रंगाच्या शिधापत्रिका नव्हता. याच प्रकारच्या शिधापत्रिकांची मोठी मागणी होती. आता त्याही प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या असतांना तातडीने मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सद्या केंद्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेच्या सहज मिळणा:या लाभामुळे केशरी रंगाची शिधापत्रिकांची अधिक गरज भासत असते.प्रशासनाचा दाखला ही चालत असल्या तरी या योजनेशी संबंधीत खाजगी दवाखाने शिधापत्रिकाचाच आग्रह धरत असतात. अशा वेळी संबंधीत रुग्णांच्या नातेवाईकांना निराश व्हावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. शासनाने महागडय़ा आजारांवर रुग्णांना भरीव मदत उपलब्ध करून दिली असली तरी लाल फितीच्या उदासिनतेमुळे वंचित राहावे लागत असल्याचा आरोप लाभार्थ्ीनी केला आहे. सद्या दहावी-बारावीचे निकाल लागले आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची लगबगही विद्याथ्र्यामध्ये सुरू आहे. साहजिकच त्यांना उत्पन्न, जातीचा दाखल्यांची पूर्तता करावी लागणार आहे. परंतु रेशनकार्डामुळे त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होत  आहे. दरम्यान प्रशासनाकडेही पुरवठा शाखेने जवळपास दीड, 200 प्रस्ताव  पाठविले आहेत. मात्र स्वाक्षरी  अभावी ते तसेच धुळखात पडले आहे. निदान प्रभारी प्रशासनाने तरी तेथे पडलेली प्रकरणांची पडताळणी  करून निकाली काढावीत अशी लाभाथ्र्याची मागणी आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. 

लाभार्थ्ीनी रेशनकार्डसाठी पुरवठा शाखेकडे प्रकरणे दाखल केले असले तरी विविध त्रुटींमुळे साधारण 150 प्रस्ताव नाकारण्यात आले असून, ते तशीच महिनाभरापासून धुळखात पडल्याचे सूत्रांनी सांगितले. कागदपत्रांच्या पूर्तता करण्यासाठी संबंधितांना अनेक वेळा सूचना दिल्या आहेत. या उपरांतही त्यांनी कागदपत्रे आणून दिलेले नाही. असेही पुरवठा शाखेतील सूत्रांनी सांगितले. वास्तविक संबंधीत ग्राहकांनीही कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित आहे.