शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

संबंधित डॉक्टरावरील कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

ब्राह्मणपूरी : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यानेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप करीत कुटुंबीयांनी मृतदेह पहाटे ...

ब्राह्मणपूरी : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यानेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप करीत कुटुंबीयांनी मृतदेह पहाटे तीन वाजेपर्यंत डॉक्टराच्या घराच्या अंगणातच ठेवला. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर २९ रोजी पहाटे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेला आठवडा उलटला असून, संबंधित बोगस डॉक्टरावरील कारवाई गुलदस्त्यात असून, शल्य चिकित्सक यांच्या अभिप्रायाकडे लक्ष लागून आहे.

२१ ऑगस्ट रोजी सुलतानपूर येथील चेतना डिगंबर पाटील (१६) हिला थंडी-ताप आल्याने, गावातीलच एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी आणले होते. तपासणी केल्यानंतर डॉ.राजेंद्र श्रीपत पाटील यांनी चेतनाच्या कमरेवर इंजेक्शन दिले, परंतु काही वेळातच तिला रिॲक्शन आली. त्यामुळे उपचारासाठी शहादा, नंदुरबार व धुळे येथे नेण्यात आले, पण धुळे येथे उपचार करताना २८ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून डॉ.राजेंद्र पाटील हे पसार झाल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त करीत, त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्याशिवाय अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेत थेट मृतदेह संबंधित डॉक्टरच्या अंगणात ठेऊन डॉक्टरला अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. चार तास होऊन पोलीस प्रशासन व गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी कुटुंबीयांची समजूत घालून शल्य चिकित्सक यांचा अभिप्राय आल्यावरच, आम्हाला संबंधित डॉक्टरला अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यावर संबंधित बालिकेवर अंतिम संस्कार करण्यात आला, परंतु घटनेला आठ दिवसांहून अधिक काळ झाल्याने शल्य चिकित्सकांचा अभिप्राय आला का नाही...? पोलीस प्रशासनाने संबंधित बोगस डॉक्टरला अटक केली का नाही...? असा तर्कवितर्क लावत कुटुंबातील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित डॉक्टरावरील कारवाई गुलदस्त्यात तर नाही ना, असा प्रश्न सुलतानपूर ग्रामस्थांनीही उपस्थित केला आहे.

बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी

एका १६ वर्षीय बालिकेला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने बोगस डॉक्टरचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बोगस डॉक्टरामुळे असा कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला असेल, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील जनतेला आला पडत असल्याने, बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.