शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

प्रकाशा येथे दोन्ही भावांचे आठ दिवसाच्या अंतराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

सविस्तर वृत्त असे की, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीला खोटं ठरवणारी घटना प्रकाशा येथे घडली. प्रकाशा ...

सविस्तर वृत्त असे की, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीला खोटं ठरवणारी घटना प्रकाशा येथे घडली. प्रकाशा येथील विजय मदन चौधरी (वय ५८) व लक्ष्मण मदन चौधरी (६२) हे दोघे भाऊ गावाच्या नागबरडा येथे राहत होते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. त्यामुळे गावात हे दोघे भाऊ एकाच मोटारसायकल फिरत शेतीची कामे करत असत. एवढेच नव्हे, तर गावात किराणा, भाजीपाला घेण्यासह परिवारातील सुख-दु:ख, लग्नसमारंभ, पूजापाठ सर्व कार्यक्रमांना सोबतच फिरायचे. त्यामुळे दोन्ही भावांची जोडी प्रसिद्ध होती. ‘शोले’मधील जय आणि वीरूसारखी या भावांची पक्की मैत्री होती. बालपणापासून तर वयाच्या ५५-६० वर्षांपर्यंत एकमेकांची सावली बनून राहिले. दोघांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ, होता. त्यामुळे गावात कोणाजवळ भांडण नव्हतेच. एक महिन्यापूर्वी लक्ष्मण चौधरी यांच्या मुलीची मुलगी म्हणजे नातीचा विवाह सारंखेडा येथे झाला. या सुखदप्रसंगी दोघा भावांच्या परिवाराने या विवाहाला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले होते. या सुखदप्रसंगी कोणालाही जाणवले नाही की, त्यांच्या घरी एक महिन्याभरानंतर एवढा दुःखद प्रसंग येणार आहे. विजय चौधरी यांचा दुर्धर आजारावर औषधोपचार सुरू असताना २७ मार्च रोजी निधन झाले. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच ३ एप्रिल रोजी म्हणजे त्यांचे मोठे बंधू लक्ष्मण मदन चौधरी यांचेही अचानक निधन झाले. दोन्ही भावांच्या निधनाच्या घटनेने कुटुंब सुन्न झाले आहे. दोन्ही भावांनी बालपण, शिक्षण, शेती व्यवसाय, संसार सर्व सोबतच केला आणि जगाचा निरोप घेतानाही सोबतच गेले.