शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

बोरद आरोग्य केंद्रात २९ गावांचा भार अवघ्या १६ कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

कर्मचाऱ्यांना बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रात जावे लागते. तरी जवळपास ४२ हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्राला जोडले ...

कर्मचाऱ्यांना बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रात जावे लागते. तरी जवळपास ४२ हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्राला जोडले आहे. मात्र कामाचा मोठा भार फक्त येथील १६ कर्मचाऱ्यांना उचलावा लागत आहे.वास्तविक या प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी शंभरपेक्षा अधिक रुग्ण उपाचार घेत असतात. त्याच बरोबर आरोग्य केंद्रात नियमित संतती शस्त्रक्रिया करण्यात येतात. परिसरातील तीस ते चाळीस महिलांची प्रसूती केल्या जात असून दरमहा लसीकरण करण्यात येत असते. गेल्या वर्षापासून कोरोना महामारीची भयावह परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीची इतरत्र बदली करण्यात आली असल्याने जुन्या जागी नवीन कर्मचारी देण्यात आले नसल्याने उलट कोरोना महामारीत काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असताना कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहेत.

राज्य शासनाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याची घोषणा केली असून तळोदा तालुक्यात कंत्राटी कर्मचारी नियुक्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. बोरद केंद्रात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सतत वरिष्ठाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या अहवालाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याने निदान मानधन तत्त्वावर तरी प्रशासनाने नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा,अशी मागणी होत आहे.

लाखापूर उपकेंद्रात डॅाक्टरच नाही

बोरद प्राथमिक केंद्र अंतर्गत लाखापूर येथे आरोग्य उपकेंद्र सुरू असून सदर उपकेंद्रात परिसरातील दुर्गम गाव, पाड्यातील नागरिक उपचाराकरिता येतात. परंतु येथील वैद्यकीय अधिकारीची जागा रिक्त असल्याने इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम भागवावे लागत आहे. वास्तविक दुर्गम भागातील हे उपकेंद्र असल्यामुळे येथे कायमस्वरूपी नियमित डॉक्टरची आवश्यकता आहे. तरीही नियमित अधिकारी दिला जात नसल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण रुग्णालयांची मागणी

या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे अजूनही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयांचा प्रश्न कायम आहे. त्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून कमी जागेमुळे आरोग्य केंद्रातील शिबिरे बाहेर घ्यावी लागत आहे.