शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांची नंदुरबार जि.प.चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वच बदल्यांमध्ये अनेक जणांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. अशा सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यापुढील बैठक ही यंदाच्या पंचवार्षिकची शेवटची बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वच बदल्यांमध्ये अनेक जणांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. अशा सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यापुढील बैठक ही यंदाच्या पंचवार्षिकची शेवटची बैठक राहणार असल्याची शक्यता लक्षात घेता पुढील बैठकीत अधिकाधिक विषय चर्चेला आणण्याचेही या वेळी ठरविण्यात आले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते.बैठकीत नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या वेळी बदल्या टाळण्यासाठी काही कर्मचा:यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी बदल्या रद्द करून घेतल्या. त्यातील काही प्रमाणपत्रे ही बोगस असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बोगस प्रमाणपत्र सादर करणा:यांची चौकशी करावी. ज्यांनीही नोकरीसाठी, बदल्यांसाठी किंवा इतर कारणांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केली असतील त्या सर्वाच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी मेडिकल बोर्डाकडे पाठवावी, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी संबंधित विभागाने प्रक्रिया पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन बदल्या टाळणा:यांचे लवकरच पितळ उघड पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिक्षक नियुक्तीचा घोळआंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा घोळ संपता संपत नसल्याची बाब सागर धामणे यांनी मांडली. आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक हे उपशिक्षक आहेत. त्यातील अनेकांना पदवीधर शिक्षकांच्या जागेवर नियुक्ती दिली आहे. अशा जागांवर उपशिक्षकांची नियुक्ती कशी शक्य आहे? शिक्षण विभागाने चुकीची माहिती शासनाला कळविल्यानेच हे झाल्याचा आरोपही त्यांनी केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे यांनी पदवीधरांचे प्रमोशन करून त्या जागा रिक्त केल्या जातील व त्या ठिकाणी नंतर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आंतरजिल्हा बदलीने  शिक्षिकांना आदेश नाहीत, त्यामुळे पगार नाहीत. त्यावर प्रभारी शिक्षणाधिकारी कांबळे यांनी ऑफलाइन पगार काढण्यात येणार असल्याचे सांगितले. जर शिक्षिकांना नियुक्तीच दिली गेली नाही तर आदेश कसे काढणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.अनागोंदी कारभाराचा आरोपशिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप सभापती आत्माराम बागले यांनी केला. शिक्षक बदल्यांसारखाच केंद्रप्रमुखांच्या बदल्यांमध्येदेखील घोळ झाला आहे. संघटनेचे पदाधिकारी एकाच ठिकाणी 11 वर्षापेक्षा जास्त काळ राहत आहेत. अशांना कधी हलविणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सांगळे यांनी सांगितले, संघटनेच्या अध्यक्षांना जिल्हा परिषद नियमावली आहे.    दोन वेळा पाच-पाच वर्ष त्यांना   जिल्हा मुख्यालयाजवळ ठेवता येते. नंतर बदली करता येते. त्यामुळे     अशा संघटना अध्यक्षांची यादी  काढून त्यांच्याही बदल्या करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.यावेळी सर्व विषय समिती सभापती, सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.