शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांची नंदुरबार जि.प.चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वच बदल्यांमध्ये अनेक जणांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. अशा सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यापुढील बैठक ही यंदाच्या पंचवार्षिकची शेवटची बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वच बदल्यांमध्ये अनेक जणांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. अशा सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यापुढील बैठक ही यंदाच्या पंचवार्षिकची शेवटची बैठक राहणार असल्याची शक्यता लक्षात घेता पुढील बैठकीत अधिकाधिक विषय चर्चेला आणण्याचेही या वेळी ठरविण्यात आले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते.बैठकीत नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या वेळी बदल्या टाळण्यासाठी काही कर्मचा:यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी बदल्या रद्द करून घेतल्या. त्यातील काही प्रमाणपत्रे ही बोगस असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बोगस प्रमाणपत्र सादर करणा:यांची चौकशी करावी. ज्यांनीही नोकरीसाठी, बदल्यांसाठी किंवा इतर कारणांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केली असतील त्या सर्वाच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी मेडिकल बोर्डाकडे पाठवावी, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी संबंधित विभागाने प्रक्रिया पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन बदल्या टाळणा:यांचे लवकरच पितळ उघड पडेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिक्षक नियुक्तीचा घोळआंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा घोळ संपता संपत नसल्याची बाब सागर धामणे यांनी मांडली. आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक हे उपशिक्षक आहेत. त्यातील अनेकांना पदवीधर शिक्षकांच्या जागेवर नियुक्ती दिली आहे. अशा जागांवर उपशिक्षकांची नियुक्ती कशी शक्य आहे? शिक्षण विभागाने चुकीची माहिती शासनाला कळविल्यानेच हे झाल्याचा आरोपही त्यांनी केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे यांनी पदवीधरांचे प्रमोशन करून त्या जागा रिक्त केल्या जातील व त्या ठिकाणी नंतर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आंतरजिल्हा बदलीने  शिक्षिकांना आदेश नाहीत, त्यामुळे पगार नाहीत. त्यावर प्रभारी शिक्षणाधिकारी कांबळे यांनी ऑफलाइन पगार काढण्यात येणार असल्याचे सांगितले. जर शिक्षिकांना नियुक्तीच दिली गेली नाही तर आदेश कसे काढणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.अनागोंदी कारभाराचा आरोपशिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप सभापती आत्माराम बागले यांनी केला. शिक्षक बदल्यांसारखाच केंद्रप्रमुखांच्या बदल्यांमध्येदेखील घोळ झाला आहे. संघटनेचे पदाधिकारी एकाच ठिकाणी 11 वर्षापेक्षा जास्त काळ राहत आहेत. अशांना कधी हलविणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सांगळे यांनी सांगितले, संघटनेच्या अध्यक्षांना जिल्हा परिषद नियमावली आहे.    दोन वेळा पाच-पाच वर्ष त्यांना   जिल्हा मुख्यालयाजवळ ठेवता येते. नंतर बदली करता येते. त्यामुळे     अशा संघटना अध्यक्षांची यादी  काढून त्यांच्याही बदल्या करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.यावेळी सर्व विषय समिती सभापती, सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.