शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोरदला दर मंगळवारी जनता कर्फ्युचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : बोरद येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर मंगळवारी जनताकर्फ्यु तर उर्वरित सहा दिवस सकाळी सात ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : बोरद येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर मंगळवारी जनताकर्फ्यु तर उर्वरित सहा दिवस सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला असून, सर्व व्यवसायिकांनी व दुकानदारांनी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी तळोदा, शहादा, नवापूर व नंदुरबार या चारही शहरांमध्ये ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहिर केले आहे. तसेच प्रकाशा व म्हसावद ही मोठी गावेही तीन दिवस बंद असल्याने सर्व जनता बोरद येथे बाजारासाठी व माल खरेदीसाठी येत असल्याने बोरद येथे मोठी गर्दी होते आहे. तसेच बोरदपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजाली गावामध्ये १७ वर्षीय युवक पॉझिटीव्ह निघाल्याने परिसरातील ४५ गावातील नागरिक बोरद येथे बाजार करण्यासाठी येत असतात. गावात गर्दी होऊ नये म्हणून बोरद ग्रामपंचायतीच्या सरपंच वासंतीबाई नरहर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवून दर मंगळवारी जनता कर्फ्यु तर इतर सहा दिवस सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू रहातील.या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद रहातील असा निर्णय घेण्यात आला. या वेळी सरपंच वासंतीबाई ठाकरे, उपसरपंच रंजणकोरबाई राजपूत, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, बैसिंग पवार, शांतीलाल पवार, मंगलसिंग चव्हाण, बुध्या गुमान माळी, सीताराम ठाकरे, इंदिराबाई चव्हाण, सुरेखा धोडरे, मनीषा पाडवी, सुभाबाई ठाकरे, तुलसीदास पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते.