शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

रक्तसाठा अवघा चार दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत १ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत १ एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. सुदैवाने सध्या अपघातातील जखमी व नियमित शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मागणी कमी असल्यामुळे तुटवडा जाणवत नसला तरी येत्या काळात बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे. शिबिर घेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.कोरोनाच्या संसर्गाच्या भितीमुळे सध्या रक्तदानाचे प्रमाण मंदावले आहे. गेल्या १० दिवसात तर कुणीही रक्तदानासाठी फिरकले नसल्याची स्थिती आहे. यामुळे नंदुरबारातील सिव्हील मधील रक्तपेढी आणि जनकल्यान या खाजगी रक्तपेढीत रक्तसाठा मर्यादीत आहे. दिवसेंदिवस हा साठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.कोरोना व रक्तदानकोरोना व रक्तदान यांचा परस्पर काहीही संबध नाही. प्राथमिक तपासणी करून कुणालाही रक्तदान करता येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रक्तदान करतांना होऊ शकतो हा समज चुकीचा आहे. जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत रक्तदानासाठी वेगळा कक्ष आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून रक्तदान न करणे ही बाब चुकीची आहे. नागरिकांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.चार ते पाच दिवस पुरेलसध्या असलेला शिल्लक रक्तसाठा लक्षात घेता तो एप्रिलच्या १ तारखेपर्यंत किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. रक्तदानासाठी अशीच स्थिती राहिली तर पुढील काळात बिकट स्थिती राहणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या १६० बॅग रक्त उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी सांगितले तर खाजगी जनकल्यान रक्तपेढीत १ एप्रिलपर्यंत पुरेल इतका साठा आहे. त्यातही ओ पॉझिटीव्ह वगळता इतर गटाचा साठा कमी असल्याचे समन्वयक डॉ.अर्जून लालचंदाणी यांनी स्पष्ट केले.शिबिर नको, वैयक्तीक या...सध्या कोरोनामुळे एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजीत करण्याऐजी इच्छूकांनी दोन ते तीनच्या संख्येने रक्तपेढींमध्ये येवून रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.दोन्ही ठिकाणी वेगळे कक्ष आहे. तेथे निर्जूंतूकीकरणासह इतर सर्व उपाययोजना केलेल्या असतात. त्यामुळे कोरोनाबाबत कुणीही भिती बाळगण्याचे कारण नाही असेही डॉ.आर.डी.भोये व डॉ.अर्जून लालचंदाणी यांनी स्पष्ट केले.