शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

रक्तसाठा अवघा चार दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत १ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत १ एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. सुदैवाने सध्या अपघातातील जखमी व नियमित शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मागणी कमी असल्यामुळे तुटवडा जाणवत नसला तरी येत्या काळात बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे. शिबिर घेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.कोरोनाच्या संसर्गाच्या भितीमुळे सध्या रक्तदानाचे प्रमाण मंदावले आहे. गेल्या १० दिवसात तर कुणीही रक्तदानासाठी फिरकले नसल्याची स्थिती आहे. यामुळे नंदुरबारातील सिव्हील मधील रक्तपेढी आणि जनकल्यान या खाजगी रक्तपेढीत रक्तसाठा मर्यादीत आहे. दिवसेंदिवस हा साठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.कोरोना व रक्तदानकोरोना व रक्तदान यांचा परस्पर काहीही संबध नाही. प्राथमिक तपासणी करून कुणालाही रक्तदान करता येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रक्तदान करतांना होऊ शकतो हा समज चुकीचा आहे. जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढीत रक्तदानासाठी वेगळा कक्ष आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून रक्तदान न करणे ही बाब चुकीची आहे. नागरिकांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.चार ते पाच दिवस पुरेलसध्या असलेला शिल्लक रक्तसाठा लक्षात घेता तो एप्रिलच्या १ तारखेपर्यंत किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. रक्तदानासाठी अशीच स्थिती राहिली तर पुढील काळात बिकट स्थिती राहणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या १६० बॅग रक्त उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी सांगितले तर खाजगी जनकल्यान रक्तपेढीत १ एप्रिलपर्यंत पुरेल इतका साठा आहे. त्यातही ओ पॉझिटीव्ह वगळता इतर गटाचा साठा कमी असल्याचे समन्वयक डॉ.अर्जून लालचंदाणी यांनी स्पष्ट केले.शिबिर नको, वैयक्तीक या...सध्या कोरोनामुळे एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजीत करण्याऐजी इच्छूकांनी दोन ते तीनच्या संख्येने रक्तपेढींमध्ये येवून रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.दोन्ही ठिकाणी वेगळे कक्ष आहे. तेथे निर्जूंतूकीकरणासह इतर सर्व उपाययोजना केलेल्या असतात. त्यामुळे कोरोनाबाबत कुणीही भिती बाळगण्याचे कारण नाही असेही डॉ.आर.डी.भोये व डॉ.अर्जून लालचंदाणी यांनी स्पष्ट केले.