शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लास्टींग’मुळे प्रकाशा बॅरेजला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:55 IST

प्रकाशा : तापी नदीवर येथे नव्याने पूल बांधकामासाठी ब्लास्टींगद्वारे खड्डे खोदले जात असल्याने जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाला ...

प्रकाशा : तापी नदीवर येथे नव्याने पूल बांधकामासाठी ब्लास्टींगद्वारे खड्डे खोदले जात असल्याने जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाला आहे. तसेच कोळदा ते सेंधवा दरम्यान सुरू असलेले रस्त्याच्या रुंदीकरण कामांतर्गत प्रकाशाजवळ जोडणारे रस्ते अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे.याबाबत वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रकाशा गावाजवळील तापी नदीवरील जुन्या पुलाजवळ नवीन पुलाचे बांधकामही करण्यात येत आहे. या पुलाच्या कामासाठी तापी नदीपात्रात ब्लास्टींग करून खड्डे खोदण्यात येत आहेत. या ब्लास्टींगमुळे जवळच असलेल्या बॅरेजला धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थ व शेतक:यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच हे काम रात्री 11 ते मध्यरात्रीर्पयत करण्यात येते. ब्लास्टींगमुळे प्रकाशा गावातील घरांचे दारे-खिडक्यांनाही हादरा बसतो. ब्लास्टींगमुळे बॅरेजला धोका निर्माण झाला तर त्याला कोण जबाबदार राहील, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. प्रकाशा बॅरेज प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.जोडरस्ते ठरताहेत अपघातीप्रकाशा गावाजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. मात्र काँक्रिटीरणाचे काम जेथे जेथे झाले आहे त्याठिकाणी जोडणारे रस्ते योग्य नसल्याने अपघात होत आहेत. प्रकाशा-वैजाली चौफुली, बसथांबा चौफुली, मुरारी पेपर मीलजवळ, त:हावद रस्ता, नांदर्डे गावाला जोडणारा रस्ता आदी ठिकाणी जोडणारे रस्ते खाली आहेत. या जोडरस्त्यांना केलेली भर योग्य न झाल्याने रोजच वाहने स्लीप होणे, अवजड वाहने मागे येणे आदींमुळे अपघात होत आहे.रस्त्याचे काम अपूर्णप्रकाशा गावालगत काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रकाशा-तळोदा रस्त्यावर भुवनेश्वरी पेट्रोल पंपाजवळ, प्रकाशा-शहादा रस्तावर रामनगरजवळ, धुरखेडा रस्त्याजवळ काम अपूर्ण आहे. काम अपूर्ण असल्याने याठिकाणी कच्च्या रस्त्यामुळे उडणा:या धुळीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याबाबत याठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होत आहेत.या सर्व समस्यांना कंटाळून प्रकाशा येथील ग्रामस्थ व शेतक:यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 29 ऑक्टोबरपासून रस्ता रोको आंदोलन करण्याचा  इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर हरी पाटील, वसंत चौधरी, राजाराम चौधरी, लिंबा चौधरी, शरद पाटील, पुरुषोत्तम पाटील, जगदीश महाजन, नारायण चौधरी, अशोक चौधरी, अनिल भोई, आदींसह        शेकडो ग्रामस्थ व शेतक:यांच्या सह्या आहेत.