नंदुरबार : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करत भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुका झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्याबरोबर त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हाताशी धरून ममता बॅनर्जी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करणे, त्यांचा खून करणे, भाजप कार्यालयाची तोडफोड करणे असे निंदनीय प्रकार सुरू केले. या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष नंदुरबार जिल्हा कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना याविषयीचे निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात खासदार डाॅ. हिना गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, नगरसेवक गौरव चौधरी, महिला मोर्चा तळोदा तालुकाध्यक्ष भारती पावरा, संजय पाटील, आदी सहभागी झाले होते.
भाजपतर्फे प. बंगालमधील हिंसाचाराचा विरोध, तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST