शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

महुफूलापासून बिस्कीटचा प्रकल्प रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:27 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात या झाडांची विपुलता लक्षात घेता या फुलांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. महुफुलांमधील जीवनसत्व लक्षात घेता त्यापासून बिस्कीट तयार करण्याचा प्रकल्प देखील असाच बारगळला आहे.       सातपुडय़ाच्या द:याखो:यात महुफूलांची झाडे विपूल प्रमाणात आहेत. या फुलांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण देखील अधीक आहे. सातपुडय़ात जागोजागी आणि सहज उपलब्ध होणा:या या झाडांच्या फुला,फळांचा उपयोग स्थानिक आदिवासींसाठीच करून घ्यावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजना आहेत. काही संस्थांनी महू फुलाच्या झाडाचे अत्याधुनिक कलमे देखील उपलब्ध करून दिली आहेत. कमी कालावधीत मोठे होणारे आणि फुल,फळ देणारे हे कलम आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. परंतु केवळ फुलांचे आणि टोळंबीचे उत्पादन घेवून उपयोग नाही तर त्यांच्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ देखील निर्माण होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात महूफुलांपासून बिस्कीट तयार करण्याचे स्थानिक उद्योग आहेत. या बिस्किटांना चांगली मागणी देखील आहे. कुपोषीत मुलांसाठी ती उपयोगी ठरतात. ती बाब हेरून जिल्ह्यातील बचत गटांना देखील या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही बचत गटांना गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी देखील पाठविण्यात आले. तेथून प्रशिक्षण घेवून ते आले देखील परंतु स्थानिक स्तरावर त्याचे युनिट सुरू करण्यासंदर्भात फारशी उत्सूकता दाखविली गेली नसल्याचेच चित्र आहे. ज्या ठिकाणी या युनिटला जागा हवी आहे किंवा तत्वत: मंजुर आहे तेथे खुद्द आदिवासी विकास विभागाच त्याला ना हरकत दाखला देत नसल्याची स्थिती आहे. 

प्रक्रिया उद्योगांची नुसतीच घोषणा.. सातपुडय़ात  महूफुल, आंबा, सिताफळ यांची झाडे मोठय़ा प्रमाणावर आहे. सिझननुसार आदिवासी कुटूंब या झाडांपासून ब:यापैकी उत्पादन मिळवत असतात. परंतु स्थानिक ठिकाणीच या झाडांच्या फळावरील प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण बदलणार आहे. परिणामी आरोग्य आणि आर्थिक समस्याही सुटणार आहे. परंतु वेळोवेळी राजकारणी मंडळी केवळ प्रकल्प उद्योगांची घोषणा करतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.