शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

महुफूलापासून बिस्कीटचा प्रकल्प रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:27 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील अनेक आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण हे महूफुलाच्या झाडाच्या उत्पादनापासून  आहे. सातपुडय़ात या झाडांची विपुलता लक्षात घेता या फुलांवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. महुफुलांमधील जीवनसत्व लक्षात घेता त्यापासून बिस्कीट तयार करण्याचा प्रकल्प देखील असाच बारगळला आहे.       सातपुडय़ाच्या द:याखो:यात महुफूलांची झाडे विपूल प्रमाणात आहेत. या फुलांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण देखील अधीक आहे. सातपुडय़ात जागोजागी आणि सहज उपलब्ध होणा:या या झाडांच्या फुला,फळांचा उपयोग स्थानिक आदिवासींसाठीच करून घ्यावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजना आहेत. काही संस्थांनी महू फुलाच्या झाडाचे अत्याधुनिक कलमे देखील उपलब्ध करून दिली आहेत. कमी कालावधीत मोठे होणारे आणि फुल,फळ देणारे हे कलम आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. परंतु केवळ फुलांचे आणि टोळंबीचे उत्पादन घेवून उपयोग नाही तर त्यांच्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ देखील निर्माण होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात महूफुलांपासून बिस्कीट तयार करण्याचे स्थानिक उद्योग आहेत. या बिस्किटांना चांगली मागणी देखील आहे. कुपोषीत मुलांसाठी ती उपयोगी ठरतात. ती बाब हेरून जिल्ह्यातील बचत गटांना देखील या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही बचत गटांना गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी देखील पाठविण्यात आले. तेथून प्रशिक्षण घेवून ते आले देखील परंतु स्थानिक स्तरावर त्याचे युनिट सुरू करण्यासंदर्भात फारशी उत्सूकता दाखविली गेली नसल्याचेच चित्र आहे. ज्या ठिकाणी या युनिटला जागा हवी आहे किंवा तत्वत: मंजुर आहे तेथे खुद्द आदिवासी विकास विभागाच त्याला ना हरकत दाखला देत नसल्याची स्थिती आहे. 

प्रक्रिया उद्योगांची नुसतीच घोषणा.. सातपुडय़ात  महूफुल, आंबा, सिताफळ यांची झाडे मोठय़ा प्रमाणावर आहे. सिझननुसार आदिवासी कुटूंब या झाडांपासून ब:यापैकी उत्पादन मिळवत असतात. परंतु स्थानिक ठिकाणीच या झाडांच्या फळावरील प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी कुटूंबांचे अर्थकारण बदलणार आहे. परिणामी आरोग्य आणि आर्थिक समस्याही सुटणार आहे. परंतु वेळोवेळी राजकारणी मंडळी केवळ प्रकल्प उद्योगांची घोषणा करतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.