शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

शेजारच्या गुजरात राज्यातील उच्छलमध्ये बर्ड फलूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्रीमधील बर्ड फ्लू अहवाल एच ५एन ८ विषाणू बाधित होते. परंतू गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड ...

नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्रीमधील बर्ड फ्लू अहवाल एच ५एन ८ विषाणू बाधित होते. परंतू गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच ५एन १ आला आहे. परंतु या पोल्ट्रीतील संचालक अनीस टिमोल यांनी सांगितले की, येथील पोल्ट्रीत पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी नियमित तपासणी करीत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तापी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना संपर्क केला असता, उच्छलच्या नॅशनल पोल्ट्रीनजीक महाराष्ट्रातील एक किलोमीटर परिसरात किती पोल्ट्री येतात याची पाहणी करून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून पुढील किलिंग ऑपरेशन ठरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीत १९७२ साली सुरू करण्यात आली आहे. नवापूर परिसरातील सर्वांत जुनी पोल्ट्री आहे. यात एकूण १७ हजार कुकुट पक्षी आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुजरात राज्यातील पथक पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. नवापुरात बर्ड फ्लूची लागण झाल्याने गुजरात राज्यातील सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. या संदर्भात उच्छल पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. उच्छल पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिराने पोलिस बंदोबस्त दिला होता. गुजरात राज्यात बर्ड फ्लू लागण होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात आली. परंतू गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांकडून काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी शेजारील गुजरात मधील तापी व डांग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नवापूरच्या संदर्भात खबरदारी म्हणून माहिती देण्यात आली होती. त्यानंतर देखील गुजरात राज्यात बर्ड फ्लू शिरकाव झाला. नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुसऱ्यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कुकुट पक्षी नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.