शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शहादा तहसीलला बायोमेट्रिक सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST

शहादा : अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी येथील तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र ...

शहादा : अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी येथील तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात आले आहे. तहसीलदारांपासून ते थेट शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच हजेरी या बायोमेट्रिक यंत्राद्वारे सुरू करण्यात आली आहे. परिणामी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढेल तर दांडी बहाद्दरांना निश्चितच पूर्णवेळ थांबावे लागणार आहे.

शासकीय कार्यालय म्हटलं म्हणजे साहेब एवढ्यात होते, तुम्ही यायच्या अगोदरच जेवायला गेले आहेत आता येतीलच, मिटींगला गेलेत, पंचनाम्यासाठी ग्रामीण भागात आहेत हे सगळे परवलीचे शब्द ग्रामीण भागातून कार्यालयात कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या कानी पडतात. त्यामुळे नागरिकांचे एका खेपेत काम होणे म्हणजे दुर्लभच. येथील तहसील कार्यालय हे शहरापासून काही अंतरावर असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसस्थानकापासून रिक्षा करुन कार्यालयात जावे लागते. साहजिकच वेळेवर संबंधित अधिकारी, कर्मचारी कार्यालयात न मिळाल्यास काम तर होतच नाही शिवाय वेळ व पैसाही खर्च होतो. तहसील कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्र लावल्याने कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती व कामकाजाला निश्चितच गती प्राप्त होईल. साहजिकच प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांना कोण कर्मचारी कामावर आहेत व कोण रजेवर आहेत, याची इत्यंभूत माहितीही मिळेल. शिवाय कामकाजात गती येऊन जनतेची कामेसुद्धा वेळेवर होण्यास मदत होईल. सध्या घरकुले, संजय गांधी, रेशनकार्ड, जमीन व्यवहार अशा वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांची वर्दळ तहसील कार्यालयात असते. अधिकारी किंवा कर्मचारी जागेवर नसल्यास लाभार्थ्यांच्या पदरी निराशा येते. अर्थात अधिकारी जिल्हा मुख्यालयात बैठकीसाठी अथवा कामासाठी गेले तर त्यादिवशी बहुतेक ठिकाणी काही कर्मचारी टेबलावर हजर नसतात, असा आरोप ग्रामस्थांकडून होतो तर काही कर्मचारी कार्यालय सुटण्याच्या आधीच म्हणजे पाच वाजेपर्यंतच निघून जात असल्याचे नागरिक सांगतात. आता बायोमेट्रिक हजेरीमुळे कार्यालयाबाहेर काही शासकीय काम नसल्यास पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील व नागरिकांचे काम यामुळे सुकर होईल.