शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

जामियातील बिहारी विद्यार्थी रेल्वेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या २०१४ बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला रवाना करण्यात आले़ यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या २०१४ बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला रवाना करण्यात आले़ यात १ हजार ८०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ हे विद्यार्थी अक्कलकुवा येथील जामिया शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत़ दरभंगा येथील ९९२ तर सहरसा राज्यातील १ हजार २२ जणांचा यात समावेश आहे़यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड़ सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मंडळ रेल्वे प्रबंधक जीव्हीएल सत्यकुमार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, जामिया संकुलाचे मौलवी हुजैफा, मौलवी, ओवैस वस्तानवी, मुख्याध्यापक रफिक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल, अखलाख शेख, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, स्टेशन प्रबंधक वसंत मंडल, वाणिज्य निरीक्षक राजकुमार कुरील, स्टेशन अधिक्षक प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते़ रेल्वे स्टेशन परिसरात परिसरात चोख बंदोबस्त होता. सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन रेल्वेत बसवण्यात आले़ रेल्वेकडून गाड्या सॅनेटाईझ करुन फवारणीची व्यवस्था केली होती़ विद्यार्थी व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले़ गावी जायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता़अक्कलकुवा येथील जामिया संकुलात शिक्षण घेणारे बिहार राज्यातील पूर्णिया येथील १ हजार २४५ तर अरेरिया येथील १ हजार २१३ विद्यार्थ्यांसाठी बुधवारीही विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे़ संकुलातून १ हजार ८२१ विद्यार्थी ५९ वाहनांद्वारे येथे दाखल झाले होते़ दुपारी दोन वाजता रेल्वेस्थानकावर नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची माहिती दिली होती़ सायंकाळी साडेतीन व चार वाजता या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या़लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार राज्यातील काही मजूर आणि अक्कलकुवा येथील जामीया संकुलात सुमारे ४ हजार २४ विद्यार्थी जिल्ह्यात अडकले होते. यातील १ हजार ८२१ विद्यार्थी हे बिहार राज्यातील होते़ लॉकडाऊन कालावधी वाढल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक घरी जावू देण्याची मागणी करत होते़ त्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री अ‍ॅड़ के.सी.पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बिहार राज्यशासनासोबत संपर्क पाठपुरावा करुन नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली होती़ या पाठपुराव्याला यश येऊन बिहार प्रशासनाने विनंती मान्य केली होती़ यानुसार विद्यार्थी आणि मजूर यांचे बिहार येथे जाण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. श्रमीक एक्स्प्रेसने सर्वांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला़लॉकडाऊन वाढल्यामुळे गावाकडे जाण्याचा नागरिकांचा आग्रह होता़ बिहार प्रशासनाने सहकार्य केले़ रेल्वेने देखील तातडीने सहकार्य केल्यामुळे नागरिकांना त्यांच्या गावी पाठविणे शक्य झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कार्यात असे काही माणूसकीचे क्षण कायम स्मरणात राहतात.-डॉ़ राजेंद्र भारुड,जिल्हाधिकारी, नंदुरबाऱ