शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार, नवापूर तालुक्यातील 167 गावांमध्ये भुजल अधिनियम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार उपविभागातील 167 गावांमधील सार्वजनिक स्त्रोतातून पिण्याच्या पाण्याच्या उपयोगाव्यतिरिक्त उपसा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार उपविभागातील 167 गावांमधील सार्वजनिक स्त्रोतातून पिण्याच्या पाण्याच्या उपयोगाव्यतिरिक्त उपसा आढळल्यास संबधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी दिले. भुजल अधिनियमाद्वारे हे आदेश त्यांनी गुरुवारी काढले.नंदुरबार उपविभागातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 167 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता येत्या काळात आहे. भुजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेने तसा अहवाल देखील दिला आहे. त्यामुळे भुजल अधिनियम 1993 कलम चार नुसार संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून 167 गावे घोषीत करण्यात आली आहेत. कलम पाच अन्वये सार्वजनिक स्त्रोतापासून एक कि.मी.च्या क्षेत्रात असलेल्या अन्य कोणत्याही स्त्रोतातून अवैध उपसा आढळून आल्यास संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही प्रातांधिकारी वान्मती सी. यांनी सांगितले.घोषीत करण्यात आलेल्या गावांमध्ये नंदुरबार तालुक्यातील आडछी, अजेपूर, अंबापूर, आष्टे, भोणे, बिलाडी, दुधाळे, फुलसरे, घोगळगाव, गुजरभवाली, गुजर जांभोली, करजकुपे, करणखेडा, कं्रढे, खामगाव, लोणखेडा, लोय, नळवे खुर्द, नळवे बुद्रूक, नांदर्खे, नारायणपूर, ओझर्दे, पथराई, पिंप्री, राकसवाडे, शिंदे, शिवपूर, विरचक, वेळावद, वासदरे, उमरगाव, उमर्दे बुद्रूक, टोकरतलाव, सुंदर्दे, वरूढ, वावद, विखरण, उमर्दे खुर्द, भालेर, सुजालपूर, शिंदगव्हाण, शिंदे, लहान शहादा, सावळदे, समशेरपूर, राकसवाडे, पातोंडा, पळाशी, नाशिंदे, नगाव, कोरीट, कोळदा, खोक्राळे, खोडसगाव, खापरखेडे, कठोरे, कानळदे, कलमाडी, काकर्दे, घुली, अक्राळे, बांमडोद, भालेर, बोराळे, चाकळे, चौपाळे, दहिंदुले खुर्द, दहिंदुले बुद्रूक, गंगापूर, मांडळ, रजाळे, सैताणे, वनकुटे, रनाळे, कार्ली, घोटाणे, आसाणे, बलदाणे, भादवड, बोराळे, ढंढाणे, आर्डीतारा, भांगडा, भवानीपाडा, देवपूर, ईसाईनगर, जळखे, कोठडे, कोठलीखुर्द, मंगरूळ, नंदपूर, मालपूर, नारायणपूर, नटावद, निंबोणी, निमगाव, वसलाई, वागशेपा, तारापूर या गावांचा समावेश आहे.नवापूर तालुक्यातील कामोद, वाघदे, वडफळी, तलावीपाडा, सोनपाडा, सागाळी, पिंपळे, पळसून, मौलीपाडा, नगारे, मोठे कडवान, चिखली, शिव्रे, बिलदा, अंजणे, कारेघाट, खोकरवाडा, लक्कडकोट, वाकीपाडा, वडकळंबी, उमरविहीर, रायपूर, प्रतापपूर, नवापाडा, नागङिारी, मोरथुवा, गंगापूर, भवरे, भांमरमाळ, बुधारफळी, बेडकीपाडा, बारीपाडा, बिलदा, चिरवे, खिकली, ढवळीपाडा, ढोंग, घोगळ, जामदे, केली, खैरवे, खडकी, खांडबारा, खातगाव, खोलविहिर, मालवन, मरोड, अंठीपाडा, मौलीपाडा, नगारे, नावली, शेगवे, सोनपाडा, झामणझर, बिलबारे, देवळीपाडा, दुधवे, खैरवे, कोकणीपाडा, मोरकारंजा, तारापाडा, उंमरडी, वडकुट, दापूर व वांझळे या गावांचा समावेश आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके आधीच दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. आता दुष्काळी गावांमध्ये भुजल अधिनियम देखील लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी उपसा आणि वापर यावर मर्याद येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.