शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भरधाव पिकअप्ने लॉरी व दुचाकींना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

तळोदा - भरधाव पिकअप् वाहनाने तळोदा शहरातील भन्साली प्लाझा परिसरातील उभ्या असलेल्या हातगाड्या, मोटारसायकली यांना धडक दिली. तसेच काही ...

तळोदा - भरधाव पिकअप् वाहनाने तळोदा शहरातील भन्साली प्लाझा परिसरातील उभ्या असलेल्या हातगाड्या, मोटारसायकली यांना धडक दिली. तसेच काही दुचाकी लांब अंतरापर्यंत फरफटत नेल्या. यात दोनजण जखमी झाले आहेत. याप्रसंगी तेथील व्यावसायिक व पादचारी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पिकअप् वाहन (क्रमांक एमएच ३९- एडी १३६६) शहरातील गजबजलेल्या डीपी रस्त्यावरून भरधाव जात होते. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने सुरुवातीला एका हातगाडीस जोरदार धडक दिली. त्यानंतर तेथे जवळच उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटारसायकलींनाही ठोकर दिली. एवढेच नव्हे, तर एका मोटारसायकलला फरफटत नेऊन सत्यम हॉटेलजवळ थांबली. या अपघातात पादचारी अनिल रमेश भांडारकर (वय ३७ ) व मुस्तकीन शेख मोइद्दीन (५५) हे जबर जखमी झाले आहेत. शिवाय सहा ते सात जणांना किरकोळ मार लागला आहे.

शुक्रवारी तळोदा शहराचा आठवडे बाजार होता. त्यातच गजबजलेल्या भन्साली प्लाझा परिसरात हे घटना घडल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. पोलिसांना घटनेची खबर मिळाल्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, फौजदार अमितकुमार बागुल, हवालदार अजय कोळी, अजय पवार, विजय ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकाला ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. तळोदा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या अपघातात जखमी झालेले पादचारी अनिल भांडारकर व मुस्किन शेख यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना डोक्यास, हाता-पायास जबर मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

घटना समजताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जितेंद्र सूर्यवंशी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, योगेश मराठे, भरत चौधरी, आनंद सोनार, संजय पटेल, जयेश सूर्यवंशी , अमनुद्दिन शेख, जितेंद्र दुबे यांनी रुग़्णालयात येऊन जखमींना मदत केली.

बसस्थानक परिसरात अतिक्रमण करून उभ्या असलेल्या हातगाड्या, बेकायदेशीर पार्किंग झोन हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या अतिक्रमणावर ठोस कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.