शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

वाहतूक बंद असल्याने पायपीट नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व ...

वाहतूक बंद असल्याने पायपीट

नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व तीन दिवस अत्यावश्यक सेवा चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बससेवा व खासगी वाहने बंद असल्याने स्थलांतरीत कामगारांना गावी परतण्यासाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने पायपीट करावी लागत आहे.

गेल्या वर्षी अचानक लॅाकडाऊन जाहीर करण्यात आल्याने स्थलांतरीत कामगारांच्या मनात यंदा धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या हालचाली लक्षात घेऊन स्थलांतरीत कामगारांचे गावाकडे पलायन सुरू झाले आहे.

गेल्या वर्षाचे अनुभव वाईट

गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने कामगारांना १५० ते २०० किलोमीटर दिवस रात्र चालत गावी यावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होऊन नये. म्हणून कामगार मिळेल, तशी व्यवस्था करून गावाकडे परत निघत आहेत.

गेल्या वर्षातील लॉकडाऊनच्या भीतीपोटी आम्ही गावी निघून आलो. अर्धवट काम सोडून गावी आलो. मालकांनी कामाचे पैसेही पूर्ण दिले नाहीत. काम झाल्यावर पैसे मिळणार असे वारंवार सांगितले आहे. कुटुंबाला सुरत येथून घेऊन आलो आहे. सध्या जंगलात जाऊन महू गोळा करत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

- किसन गावित, कामगार, विसरवाडी

सुरत येथे आम्ही गवंडी कामासाठी गेलो. महाराष्ट्रीयन मजूर असल्याने वेगळी वागणूक दिली जाते. तुमच्या महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. तुमच्यापासून भीती वाटते. काम बंद करून गावी जा, असे सांगितल्याने आम्ही गावी आलो.

- विनायक गावित, मजूर, चिंचपाडा

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन होऊ शकते. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. म्हणून लाॅकडाऊन लागण्याच्या आधीच गावी आलो आहोत.

अमृत वळवी, मजूर, विसरवाडी