शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

वाहतूक बंद असल्याने पायपीट नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व ...

वाहतूक बंद असल्याने पायपीट

नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व तीन दिवस अत्यावश्यक सेवा चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बससेवा व खासगी वाहने बंद असल्याने स्थलांतरीत कामगारांना गावी परतण्यासाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने पायपीट करावी लागत आहे.

गेल्या वर्षी अचानक लॅाकडाऊन जाहीर करण्यात आल्याने स्थलांतरीत कामगारांच्या मनात यंदा धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या हालचाली लक्षात घेऊन स्थलांतरीत कामगारांचे गावाकडे पलायन सुरू झाले आहे.

गेल्या वर्षाचे अनुभव वाईट

गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने कामगारांना १५० ते २०० किलोमीटर दिवस रात्र चालत गावी यावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होऊन नये. म्हणून कामगार मिळेल, तशी व्यवस्था करून गावाकडे परत निघत आहेत.

गेल्या वर्षातील लॉकडाऊनच्या भीतीपोटी आम्ही गावी निघून आलो. अर्धवट काम सोडून गावी आलो. मालकांनी कामाचे पैसेही पूर्ण दिले नाहीत. काम झाल्यावर पैसे मिळणार असे वारंवार सांगितले आहे. कुटुंबाला सुरत येथून घेऊन आलो आहे. सध्या जंगलात जाऊन महू गोळा करत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

- किसन गावित, कामगार, विसरवाडी

सुरत येथे आम्ही गवंडी कामासाठी गेलो. महाराष्ट्रीयन मजूर असल्याने वेगळी वागणूक दिली जाते. तुमच्या महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. तुमच्यापासून भीती वाटते. काम बंद करून गावी जा, असे सांगितल्याने आम्ही गावी आलो.

- विनायक गावित, मजूर, चिंचपाडा

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन होऊ शकते. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. म्हणून लाॅकडाऊन लागण्याच्या आधीच गावी आलो आहोत.

अमृत वळवी, मजूर, विसरवाडी