शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

क्रांतीची मशाल पेटवीत विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 12:46 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लोकशाहीर ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, स्वागताध्यक्ष वाहरू सोनवणे, डॉ.बाबूराव गुरव, संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर, अभिनेते राजकुमार तांगडे, जेलसिंग पावरा, प्राचार्य विश्वास सायनाकर, सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेचे के.डी. शिंदे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष विजय मांडके, कार्याध्यक्ष धनाजी गुरव, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक,  जयसिंग माळी, सुनील गायकवाड, प्रसेनजित गायकवाड, कुमार शिराळकर, सदाशिव मकदूम, सुरेश इंद्रजित, प्रमोद नाईक, संजय लोहकरे, सुभाष पाटील, देवीदास शेंडे आदी उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. प्रारंभी शहादा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.  प्रास्ताविक अनिल कुवर यांनी          केले. संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांचे स्वागत साहित्य सामेलन समितीच्या वतीने करण्यात आले.संमेलनाचे उद्घाटक संजय आवटे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती करताना लोकशाहीची मूल्ये अधोरेखित केली होती. त्यात ते म्हणाले होते की, शासन              व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक हवेत, आज मात्र विरोध नावाला आहे. दुसरा मुद्दा सारासार विवेक प्रत्येकाने विवेकाने वागून राज्य घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर संवैधानिक नैतिकता ही  न्याय            यंत्रणेत समानता हवी आज मात्र याउलट स्थिती आहे. न्यायमूर्ती लोया हत्येचा उलगडा झालेला नाही या गंभीर घटनेचा साधा उल्लेख माध्यमांकडे आलेला नाही. लोकशाहीचे चारही मुद्दे धोक्यात आले असताना आपण संविधानाच्या साहाय्याने पुढे जाऊन लढा दिला पाहिजे. आज सत्तेत असलेले             सरकार जर पुढच्यावर्षी निवडून आले तर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत, असे आपण गृहीत धरले पाहिजे. केंद्रातील सरकारकडून दाखवली जाणारी पाकिस्तान आणि मुस्लिमांची भीती व मतांचे जातीतून होणारे ध्रुवीकरण या देशाच्या एकतेला घातक आहे .संमेलनाचे स्वागतध्यक्ष वाहरू सोनवणे यांनी सांगितले की,            शहादा ही फुले, शाहू, आंबेडकर, अंबरसिंग महाराज यांचा वारसा असणारी भूमी आहे. विद्रोह               म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड नव्हे तर विद्रोह           म्हणजे अन्यायाविरोधात केलेले व समता बंधूता माणुसकीच्या लढय़ासाठी केलेले बंड आज सर्वानी धर्माधतेच्या विरोधात लढले पाहिजे. त्याचबरोबर कालबाह्य विचारांना टाकून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.या वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव गौतम कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात सध्या मोठय़ा प्रमाणात धार्मिक उन्माद फोफावला आहे. त्याच्याविरोधात सर्वानी संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. पुरोगामी म्हणवणा:या महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकरांचा,   गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी व  पत्रकार गौरी लंकेश यांचा खून   झाला. विचार संपविण्यासाठी हे             खून झाले. परंतु माणूस मारून विचार संपत नाहीत. ते विचार अधिक प्रभावीपणाने रुजविण्यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनात          असणारा तरुण-तरुणींचा सहभाग हा पुरोगामी आणि परिवर्तनवादी तसेच विद्रोही चळवळीसाठी आश्वासक आहे.अभिनेता राजकुमार तांगडे म्हणाले की, आजचा काळ खूप धोकेदायक आहे. राज्य सत्तेच्या विरोधात थोडे जरी बोलले तरी लगेच त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. राजसत्ता हा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक आहे. त्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.