शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीची मशाल पेटवीत विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 12:46 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लोकशाहीर ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरसिंग महाराज साहित्यनगरी (शहादा) : देशातील श्रमिक आणि शोषित समाजाचे साहित्य हे खरे साहित्य आहे . ते पुढे आले पाहिजे त्या साहित्यामुळे देशात क्रांती निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा नजूबाई गावीत यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, स्वागताध्यक्ष वाहरू सोनवणे, डॉ.बाबूराव गुरव, संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर, अभिनेते राजकुमार तांगडे, जेलसिंग पावरा, प्राचार्य विश्वास सायनाकर, सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेचे के.डी. शिंदे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष विजय मांडके, कार्याध्यक्ष धनाजी गुरव, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक,  जयसिंग माळी, सुनील गायकवाड, प्रसेनजित गायकवाड, कुमार शिराळकर, सदाशिव मकदूम, सुरेश इंद्रजित, प्रमोद नाईक, संजय लोहकरे, सुभाष पाटील, देवीदास शेंडे आदी उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. प्रारंभी शहादा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.  प्रास्ताविक अनिल कुवर यांनी          केले. संयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांचे स्वागत साहित्य सामेलन समितीच्या वतीने करण्यात आले.संमेलनाचे उद्घाटक संजय आवटे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती करताना लोकशाहीची मूल्ये अधोरेखित केली होती. त्यात ते म्हणाले होते की, शासन              व्यवस्थेला विरोध करणारे विरोधक हवेत, आज मात्र विरोध नावाला आहे. दुसरा मुद्दा सारासार विवेक प्रत्येकाने विवेकाने वागून राज्य घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर संवैधानिक नैतिकता ही  न्याय            यंत्रणेत समानता हवी आज मात्र याउलट स्थिती आहे. न्यायमूर्ती लोया हत्येचा उलगडा झालेला नाही या गंभीर घटनेचा साधा उल्लेख माध्यमांकडे आलेला नाही. लोकशाहीचे चारही मुद्दे धोक्यात आले असताना आपण संविधानाच्या साहाय्याने पुढे जाऊन लढा दिला पाहिजे. आज सत्तेत असलेले             सरकार जर पुढच्यावर्षी निवडून आले तर 2024 मध्ये निवडणुका होणार नाहीत, असे आपण गृहीत धरले पाहिजे. केंद्रातील सरकारकडून दाखवली जाणारी पाकिस्तान आणि मुस्लिमांची भीती व मतांचे जातीतून होणारे ध्रुवीकरण या देशाच्या एकतेला घातक आहे .संमेलनाचे स्वागतध्यक्ष वाहरू सोनवणे यांनी सांगितले की,            शहादा ही फुले, शाहू, आंबेडकर, अंबरसिंग महाराज यांचा वारसा असणारी भूमी आहे. विद्रोह               म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड नव्हे तर विद्रोह           म्हणजे अन्यायाविरोधात केलेले व समता बंधूता माणुसकीच्या लढय़ासाठी केलेले बंड आज सर्वानी धर्माधतेच्या विरोधात लढले पाहिजे. त्याचबरोबर कालबाह्य विचारांना टाकून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे.या वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव गौतम कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, देशात सध्या मोठय़ा प्रमाणात धार्मिक उन्माद फोफावला आहे. त्याच्याविरोधात सर्वानी संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे. पुरोगामी म्हणवणा:या महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकरांचा,   गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी व  पत्रकार गौरी लंकेश यांचा खून   झाला. विचार संपविण्यासाठी हे             खून झाले. परंतु माणूस मारून विचार संपत नाहीत. ते विचार अधिक प्रभावीपणाने रुजविण्यासाठी हे संमेलन आहे. या संमेलनात          असणारा तरुण-तरुणींचा सहभाग हा पुरोगामी आणि परिवर्तनवादी तसेच विद्रोही चळवळीसाठी आश्वासक आहे.अभिनेता राजकुमार तांगडे म्हणाले की, आजचा काळ खूप धोकेदायक आहे. राज्य सत्तेच्या विरोधात थोडे जरी बोलले तरी लगेच त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. राजसत्ता हा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक आहे. त्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले.