शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

निवडणुकीच्या वादातून मारहाण व जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/अक्कलकुवा : जिल्हा परिषद निवडणुकीचे कवित्व आता सुरू झाले असून वाद-विवाद, हाणामारी आणि एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/अक्कलकुवा : जिल्हा परिषद निवडणुकीचे कवित्व आता सुरू झाले असून वाद-विवाद, हाणामारी आणि एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत. अक्कलकुवा येथे शिवसेना कार्यालयातील वस्तू जाळल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. याच प्रकरणी प्रतिबंधीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल असून नंदुरबारात मतमोजणीच्या दिवशी दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर गावागावत वादविवाद सुरू झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जमावबंदी आदेशाचे उल्लंघनजिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतांनाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० ते १५ जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप विजयी उमेदवार कपिल चौधरी व त्यांच्या समर्थकांनी मिरवणुकीची कुठलीही परवाणगी न घेता घोषणा देत जमावाने जावून कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल खवळे यांच्या फिर्यादीवरून कपिल भरत चौधरी व इतर १२ ते १४ जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.डी.पाटील करीत आहे.शिवसेना कार्यालयात जाळपोळअक्कलकुवा येथे शिवसेना कार्यालयातील वस्तू जाळल्याप्रकरणी शिवसेना जि.प.सदस्य शंकर पाडवी यांच्या फिर्यादीवरून भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जि.प.सदस्य कपिल चौधरी यांच्यासह भाजप पदाधिकारी यांचा संशयीत आरोपींमध्ये समावेश आहे. अक्कलकुवा येथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेचे शाखा कार्यालय आहे. बुधवारी रात्री कार्यालयातील खुर्ची व इतर सामान जळाल्याचे लक्षात आले. सकाळी या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. याबाबत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शंकर आमशा पाडवी यांनी फिर्याद दिली आहे. निवडणुकीत अक्कलकुवा गटातून भाजपचे कपील चौधरी हे निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्याला व कार्यकर्त्यांना डिवचले, जातीवाचक टिप्पणी केली. रात्रीच्या वेळी त्यांनीच कार्यालय जाळल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कपिल भरत चौधरी यांच्यासह भरत देवराम चौधरी, विश्वास उखाजी मराठे, भगवान देवराम चौधरी, डिंपल भरत चौधरी, भरत रवींद्र मोरे, महेश परशुराम तोवर, संदीप राजेंद्र मराठे, जयेश भगवान चौधरी, रोहित विश्वास मराठे, मयूर विश्वास मराठे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मतमोजणी केंद्राबाहेर मारहाणमतमोजणी केंद्राबाहेर निवडणुकीच्या वादातूनच आपसात मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत होळतर्फे रनाळे येथील व्यंकट दगा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भैय्या मराठे व गिरीश मराठे आणि इतर सहा ते सात जणांनी होळतर्फे रनाळे येथे गावात का आले होेते यासंदर्भात जाब विचारून मारहाण करून शिविगाळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अशोक गावीत करीत आहे.दरम्यान, निवडणूक निकालानंतर होणारे वादविवाद लक्षात घेता पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे.राजकीय वादावादी आणि मारहाणीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी मनाई आदेशात आणखी वाढ केली आहे. शिवाय पोलीस बंदोबस्त देखील कायम राहणार आहे. यंदा सर्वच गट व गणांमध्ये चुरशीच्या व अतितटीच्या लढती झाल्या होत्या. त्यामुळे वादविवाद देखील झाले होते. परिणामी यापुढे या वादातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाणार असून कुणी कायदा हातात घेतल्यास कडक कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे.