शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

बी.डी.एस. प्रणालीचा जखमींना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जंगली श्वापदाच्या हल्ल्यात बळी अथवा जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी कार्यान्वित बी.डी.एस प्रणाली कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जंगली श्वापदाच्या हल्ल्यात बळी अथवा जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी कार्यान्वित बी.डी.एस प्रणाली कोरोनामुळे बंद करण्यात आल्याने त्याचा फटका लाभार्र्थींना बसत असून, या प्रकरणी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.सद्या वनविभागचे जंगल नष्ट झाल्यामुळे व पानवाठे ही आटल्याने रानावनात भटकणारे जंगली श्वापदे सपाटी भगात येवू लागले आहेत. त्यात ही बिबट्या, अस्वलासाराखी हिंस्त्र प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांनी तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, पपई, ऊस या पिकांमध्येच निवारा केला आहे. त्यामुळे त्यांचा नेहमीच मुक्त संचार असतो.गेल्या महिना, दीड महिन्यापासून तर अगदी दिवसा शेतमळ्यात हिंस्त्र प्राणी वावर करीत असल्याचे शेतकरी सांगातात. गेल्या पाच दिवसात मोहिदा येथील तरूण शेतकºयाच्या बळी बरोबर तालुक्यतील बेलीपाडा येथील तीन जनावरांवर अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. वनविभागने या घटनांच्या पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडले असले तरी हल्यात बळी गेलेल्या ईसमाच्या नातेवाईकांना शासनाकडून दिली जाणारी पाच लाखाची तत्काळ मदत अद्यापपर्यंत मिळालेली नाही. कारण सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभवामुळे शासनाने बीडीएस प्रणाली अर्थात तत्काल अनुदान उपलब्ध करून देणारी प्रणाली बंद केल्यामुळे लाभार्र्थींनादेखील अनुदानाचा लाभ देता येत नाही. साहजिकच कोरोनाचा फटका लाभार्र्थींना सुद्धा बासला आहे.वास्तविक मोहिदा येथील घटनेची वनविभागने युद्ध पातळीवर कार्यवाही करून मदतीचा प्रस्ताव धुळे वनविभागाकडे पाठवला आहे. तेथूनदेखील हा प्रस्ताव नागपूरला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर केव्हा कार्यवाही होईल आणि लाभाथीर्ला केव्हा मदत मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी हल्ल्यात बळी अथवा जखमी झालेल्यांना तत्काळ मदतीच्या निर्णयालाच एक प्रकारे हरताळ फासला जात असल्याचे म्हटले जात आहे.जंगली श्वापदाच्या हल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास १५ लाख रूपयांची मदत दिली जाते. त्यापैकी पाच लाख रोख तर उर्वरित दहा लाखात पाच लाखाची पाच वर्षांनी व राहिलेल्या पाच लाखांची १० वर्षांची फिक्स डिपॉजीट कुटूबाच्या नावाने राष्ट्रीयकृत बॅँकेत ठेवली जाते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासानने तत्काळ अनुदान उपलब्ध करणाºया बी.डी.एफ प्रणालीवर मर्यादा घटल्या असल्या तरी त्याचा फटका मयताच्या गरजु कुटुंबाना बसत आहे. पूर्वी या प्रणालीतूनच मयताच्या कुटुंबाला दोन दिवसात घटनेची चौकशी केल्यानंतर लगेचच पाच लाखाची आर्थिक मदत देण्याचा अधिकार स्थानिक प्रमुख अधिकाºयाला होता. मात्र प्रणालीच बंद करण्यात आल्याने त्यांचे हातच कापण्यात आले आहे. याशिवाय हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीने खासगी दवाखान्यात उपचार केले आसतील तर त्यालाच आर्थिक मदत करण्याचा शासनचा आदेश आहे. म्हणजे सरकारी रूग्णालयात उपचार केला तर त्यास मदत नाही. शासानच्या असा दुजाभावाच्या निर्णयाविषयीदेखील तीव्र नाराजीचा सूर आहे. जरी त्या जखमी व्यक्तिने सरकारी दवाखान्यात उपचार घेताला असला तरी त्याच्या कामात खोळंबा पडलेला असतो. त्यामुळे सरसकट सर्वच घटनामध्ये मदत शासनाने द्यावी, अशी मागणी आहे.

अस्वलाच्या हल्यात मयत झालेल्या व्यक्तिच्या नातेवाईकांना शासनाची आर्थिक मदत मिळण्यासाठी घटनेचा पंचनामा व चौकशी करून १५ लाखांचा प्रस्ताव धुळे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांनी ही पुढील कार्यवाही करत नागपूर वनविभागकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सबंधितांना मदत मिळेल.-ई.बी.चौधरी, सहाय्यक उपवनसंरक्षक, वन कार्यालय, तळोदा