शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

बी.डी.एस. प्रणालीचा जखमींना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जंगली श्वापदाच्या हल्ल्यात बळी अथवा जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी कार्यान्वित बी.डी.एस प्रणाली कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जंगली श्वापदाच्या हल्ल्यात बळी अथवा जखमी झालेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी कार्यान्वित बी.डी.एस प्रणाली कोरोनामुळे बंद करण्यात आल्याने त्याचा फटका लाभार्र्थींना बसत असून, या प्रकरणी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.सद्या वनविभागचे जंगल नष्ट झाल्यामुळे व पानवाठे ही आटल्याने रानावनात भटकणारे जंगली श्वापदे सपाटी भगात येवू लागले आहेत. त्यात ही बिबट्या, अस्वलासाराखी हिंस्त्र प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांनी तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, पपई, ऊस या पिकांमध्येच निवारा केला आहे. त्यामुळे त्यांचा नेहमीच मुक्त संचार असतो.गेल्या महिना, दीड महिन्यापासून तर अगदी दिवसा शेतमळ्यात हिंस्त्र प्राणी वावर करीत असल्याचे शेतकरी सांगातात. गेल्या पाच दिवसात मोहिदा येथील तरूण शेतकºयाच्या बळी बरोबर तालुक्यतील बेलीपाडा येथील तीन जनावरांवर अस्वलाने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. वनविभागने या घटनांच्या पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडले असले तरी हल्यात बळी गेलेल्या ईसमाच्या नातेवाईकांना शासनाकडून दिली जाणारी पाच लाखाची तत्काळ मदत अद्यापपर्यंत मिळालेली नाही. कारण सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभवामुळे शासनाने बीडीएस प्रणाली अर्थात तत्काल अनुदान उपलब्ध करून देणारी प्रणाली बंद केल्यामुळे लाभार्र्थींनादेखील अनुदानाचा लाभ देता येत नाही. साहजिकच कोरोनाचा फटका लाभार्र्थींना सुद्धा बासला आहे.वास्तविक मोहिदा येथील घटनेची वनविभागने युद्ध पातळीवर कार्यवाही करून मदतीचा प्रस्ताव धुळे वनविभागाकडे पाठवला आहे. तेथूनदेखील हा प्रस्ताव नागपूरला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यावर केव्हा कार्यवाही होईल आणि लाभाथीर्ला केव्हा मदत मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी हल्ल्यात बळी अथवा जखमी झालेल्यांना तत्काळ मदतीच्या निर्णयालाच एक प्रकारे हरताळ फासला जात असल्याचे म्हटले जात आहे.जंगली श्वापदाच्या हल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास १५ लाख रूपयांची मदत दिली जाते. त्यापैकी पाच लाख रोख तर उर्वरित दहा लाखात पाच लाखाची पाच वर्षांनी व राहिलेल्या पाच लाखांची १० वर्षांची फिक्स डिपॉजीट कुटूबाच्या नावाने राष्ट्रीयकृत बॅँकेत ठेवली जाते. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासानने तत्काळ अनुदान उपलब्ध करणाºया बी.डी.एफ प्रणालीवर मर्यादा घटल्या असल्या तरी त्याचा फटका मयताच्या गरजु कुटुंबाना बसत आहे. पूर्वी या प्रणालीतूनच मयताच्या कुटुंबाला दोन दिवसात घटनेची चौकशी केल्यानंतर लगेचच पाच लाखाची आर्थिक मदत देण्याचा अधिकार स्थानिक प्रमुख अधिकाºयाला होता. मात्र प्रणालीच बंद करण्यात आल्याने त्यांचे हातच कापण्यात आले आहे. याशिवाय हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीने खासगी दवाखान्यात उपचार केले आसतील तर त्यालाच आर्थिक मदत करण्याचा शासनचा आदेश आहे. म्हणजे सरकारी रूग्णालयात उपचार केला तर त्यास मदत नाही. शासानच्या असा दुजाभावाच्या निर्णयाविषयीदेखील तीव्र नाराजीचा सूर आहे. जरी त्या जखमी व्यक्तिने सरकारी दवाखान्यात उपचार घेताला असला तरी त्याच्या कामात खोळंबा पडलेला असतो. त्यामुळे सरसकट सर्वच घटनामध्ये मदत शासनाने द्यावी, अशी मागणी आहे.

अस्वलाच्या हल्यात मयत झालेल्या व्यक्तिच्या नातेवाईकांना शासनाची आर्थिक मदत मिळण्यासाठी घटनेचा पंचनामा व चौकशी करून १५ लाखांचा प्रस्ताव धुळे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांनी ही पुढील कार्यवाही करत नागपूर वनविभागकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सबंधितांना मदत मिळेल.-ई.बी.चौधरी, सहाय्यक उपवनसंरक्षक, वन कार्यालय, तळोदा