शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

समस्या जाणून घेण्यासाठी केला पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी वरिष्ठ अधिका:यांसह 20 किलोमीटर पायी प्रवास केला. दरम्यान, समस्या जाणून घेतल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिका:यांनी संबंधित अधिका:यांना दिल्या.जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, तहसीलदार राजेश थोटे, तालुका कृषी अधिकारी बापू गावीत आदी होते.नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावाकडे जाणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने जिल्हाधिका:यांनी धडगावपासून अचपार्पयत वाहनाने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवास पायी करून जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. अचपा ते तिनसमाळ असे 20 किलोमीटरचा त्यांनी अधिका:यांसह पायी प्रवास केला. तिनसमाळ येथे पलासपाणीपाडा, पाटीलपाडा, दुकानपाडा, डुठ्ठलपाडा व गुडानपाडा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून त्यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिका:यांना दिल्या. त्यांनी ग्रामस्थांशी व त्यांच्या मुलांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. गावाच्या विकासाबाबत चर्चा केल्यानंतर आचपार्पयतचा परतीचा प्रवासदेखील पायीच झाला. स्वत: जिल्हाधिकारी पायी चालत भेट देण्यासाठी आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पाडय़ावरील  नागरिक तानाजी पावरा, वसंत पावरा, रेहंडय़ा पावरा, जितेंद्र पावरा, लालदास पावरा, फाडा पावरा व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिका:यांना गावातील समस्यांविषयी माहिती दिली.