शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

निराधारांचे आधार ठरतेय तळोद्यातील अन्न छत्र परिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीने जनमनावर अक्षरश: दहशत पसरविली असून, नुसते त्याचे नाव काढले तरी मनाचा थरकाप ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीने जनमनावर अक्षरश: दहशत पसरविली असून, नुसते त्याचे नाव काढले तरी मनाचा थरकाप होतो. मात्र अशा भयानक परिस्थितीत ही तळोद्यातील अन्नछत्र परिवारातील शिलेदार आपल्या जीवाची बाजी लावत शहरातील रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या या मदतीमुळे तरी निदान कुटुंबाची एकवेळची पोटाची खळगी भरली जात आहे. तरूणांच्या या कामाचे समाजातून कौतुक केले जात आहे.कोरोना या महामारीने संपूर्ण जगात अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे त्याचा अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात लागू केला आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अगदी हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांनाच त्यांची अधिक झळ बसत आहे. कारण कामेच ठप्प झाल्यामुळे ते कामावरही जावू शकत नाही. परिणामी कामधंद्याअभावी रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन पोटाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात शासनाबरोबरच, सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून अशा कुटुंबांना मदतीचा ओघ होत असला तरी ही, मदत संबंधित कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी संतोष माळी व पूतन दुबे हे तरूण महामारीची तमा न बाळगता जीवाचे रान करत मेहनत घेत आहेत. सकाळी लवकर उठून एकाठिकाणी बसून दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करतात. दानशूर व्यक्ती, संस्थांकडून मिळालेले गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक वस्तु त्यांच्या घरी जावून आणणे व एका गोडावूनमध्ये त्याची पिशवीत समप्रमाणात पॅकींग करून प्रत्यक्ष गरीब कुटुंबांना घरपोच देतात.शहरातील साधारण पावणे चारशे गरीब कुटुंबांना मदत होत आहे. यासाठी तरूणांनी ‘अन्न छत्र परिवार’ असा ग्रुप स्थापन करून मदतीचे आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनास शहरातील दात्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात. रस्त्यावरील बेघर असलेल्यांनादेखील ते शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ जागेवरच मिळवून देत आहेत. अशा ४० भुकेल्यांची पोटाची खळगी भरली जात आहे.आमलाड वसतीगृहातील विलगीकरण कक्षातदेखील ते रूग्णांना पिण्याचे फिल्टर पाणी उपलब्ध करून देत आहे. वास्तविक कोरोनाच्या महामारीने संपूर्ण समाजावर भितीचे वातावरण आहे. अशा भयानक वातावरणात कुणीही अस काम करण्यास धजावत नाही. मात्र या दोन्ही शिलेदारांनी सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून आणिबाणीच्या परिस्थितीत दिन दुबळ्यांची सेवा करण्याचा निर्धार केला आहे. त्याचे हे प्रामाणिक कार्य पाहून प्रशासनानेदेखील त्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोघ तरूण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महामारीच्या अशा कठिण परिस्थितीत जीवनावश्यक व अन्न मिळत असल्याने शहरातील गरीब कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोना या महामारीची हातावर पोट भरणाºया कुटुंना मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. कामधंद्या अथवा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही दोघं मित्रांनी सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर मदतीचा ओघदेखील मोठ्या प्रमाणात वाढला. त्यांनी दिलेल्या मालाचे योग्य नियोजन करून अशा गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष घर पोहोच करत आहोत. प्रशासनाचेदेखील आम्हाला मार्गदर्शन व मदत मिळत आहे. गरीब कुटुंबांना शासनाबरोबरच दानशूरांची मदत मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करतात.-संतोष माळी, तळोदा