ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.24- रिझर्व बँकेकडून चलनाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सध्या नंदुरबार शहरातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे इतर ब्रँचमधून पैसे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े दोन ते चार दिवस शहरातील एटीएममध्ये पैशांची चणचण भासणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आह़े
गेल्या काही दिवसांपासून शहरातील एटीएम पैशांअभावी बंद आहेत़ शहरातील सर्वच एटीएममध्ये पैशांची चणचण असून काही ठिकाणी मात्र जसा पैसा उपलब्ध होत आहे तसे एटीएम सुरु करण्यात येत आह़े त्यामुळे आधिच पैसे कमी असल्याने नागरिकांना केवळ 500, हजार रुपयांर्पयतच पैसे एटीएममधून काढता येत आह़े बहुतेक ठिकाणी केवळ 500 व हजारच्या नोटा असून 2 हजारच्या नोटांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आल़े
दुस:या शाखेतून चलन पुरवठा
रिझर्व बँकेकडूनच पुरेशा चलनाचा पुरवठा होत नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक दिवाकर वाणी यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े स्टेट बँक ऑफ इंडिया शहरातील 14 एटीएमना चलन पुरवठा करीत असल्याने मुख्य शाखेतच पुरेसा पैसा नसल्याने चलन टंचाई जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितल़े दरम्यान, येत्या काही दिवसात लगतच्या शाखेतून पैसे आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े येत्या दोन ते चार दिवसात ग्राहकांना पुरेसे पैसे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितल़े