शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सीडीवरील तोल ठरवतो जीवनाचा समतोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नशिबी आलेल्या दारिद्र्यात ऊसतोड कामगारांना पोटासाठी काबाडकष्ट करावे लागते. त्यांना ऊस ट्रक व ट्रॅक्टरमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नशिबी आलेल्या दारिद्र्यात ऊसतोड कामगारांना पोटासाठी काबाडकष्ट करावे लागते. त्यांना ऊस ट्रक व ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी लाकडी सीडीवरून जीवघेण्या कसरती देखील कराव्या लागत आहे. या मजुरांच्या हे विदारक क्षण कुठल्याही व्यक्तीला भावनिक वेदना देणारे ठरतात. डोक्यावर मोळी घेत सीडीवर तोल धरुन जाण्याचा हा प्रसंग त्यांच्या जीवनातील गरीबीचा समतोल साधणारा ठरत आहे.बेताच्या परिस्थितीत जीवन जगणारे चाळीसभाव, कन्नड, मालेगाव, साकी व धडगाव या भागातून ऊसतोड कामगार नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर या साखर कारखान्याच्या क्षेत्रात दाखल झाले आहेत. मुळगावापासून मैलो दुर असलेल्या या ठिंकाणी ऊसतोडणीचे काम करताना या कामगारांना अनेक वेदना सहन कराव्या लागत आहे. काही ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातूनही आल्याचे दिसूनयेत आहे. साखर कारखाने सुरू असल्याने सर्व मजूर तेथेच ऊस तोडत तेथेच वास्तव्याला आहे. नंदुरबार तालुक्यात दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांमध्ये केवळ पुरुषच नसून महिला देखी समावेश आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही ऊसतोडणीचे काम करीत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडावर काबाडकष्ट करावे लागते. कारखाना चालू असेपर्यंत मजुरांना हे काम करावे लागते. त्यांना काम करताना दिवस व रात्रीचेही भान राहत नाही.पोटाची आग शमविण्यासाठी हे कामगार साप, विंचवांचेही भय ते बाळगीत नाही. मुकादमाकडून घेतलेली उचल न फिटल्यास मुकादमास व्याजासह ती रक्कम परत करावी लागते. या भीतीने घेतलेली उचल फेडणे हाच ध्यास मजुरांपुढे असतो. अशावेळी त्यांना वेळेवर जेवण तर सोडाच दोन वेळचे ताजे अन्नही मिळत नाही. अनेक वेळा शिळ्या अन्नावरच अवलंबून राहावे लागते. ऊसाच्या शेतात ऊस तोडताना उसाच्या बुडक्या व कोयते लागून अनेक कामगार जखमी होतात. थंडीच्या दिवसात त्या चिघळतातही. परंतु जखमेची काळजी घेण्यास वेळ पुरत नसल्याने ते त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे. मोळ्या बांधलेला ऊस फडाबाहेर काढण्यासाठी डोक्यावर वाहतूक करावी लागते. वाहतूक केलेला ऊस ट्रक-ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी उसाची मोळी डोक्यावर घेऊन लाकडी शीडीवर चढावे लागते. लाकडी सीडीवर चढताना मजुरांना जीवघेण्या कसरती कराव्या लागतात. अशा वेळी तोल गेल्यास खाली पडून मजुरांना आपला जीवही गमवावा लागतो.

मुळात ऊसतोडीचे काम हे अंगावर काटे आणणारे ठरते. ऊसतोडीसाठी प्रामुख्याने कोयताचा वापर केला जात असतो. झटपट काम होऊन अपेक्षेनुसार रोज मिळावा यासाठी प्रत्येक मजूराकडून धारदार कोयताच निवडला जातो. ऊसतोडणीच्या कामात धावपळ करीत असताना अंगावर अनावश्यकपणे कोयता लागत असतो. शिवाय अंगाला स्पर्श होणारा ऊसाचा पाचटमुळे अंगाची लाही-लाही देखील होते. तर बहुतांश कामगारांना ऊसाच्या कापलेल्या खोडामुळेही जखमा होतात. परंतु हे कामगार असा जखमांचा फारसा विचार न करता केवळ पोटा-पाण्याचाच विचार करतात.