शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

जिल्हा रुग्णालयात नियमांकडे पाठ ; कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरीकांना गेल्या दाेन वर्षांत मोठा आधार ठरलेले जिल्हा सामान्य रुग्णालयही आता पूर्वपदावर आले आहे. कोरोना नियंत्रणात ...

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरीकांना गेल्या दाेन वर्षांत मोठा आधार ठरलेले जिल्हा सामान्य रुग्णालयही आता पूर्वपदावर आले आहे. कोरोना नियंत्रणात आला असला तरी संसर्ग होण्याची भीती आहे; परंतु याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मात्र याचा विसर पडला असून रुग्णालयात सर्रास नियमांचा भंग होतो आहे.

याबाबत ‘लोकमत’ने पडताळणी केली असता, सकाळच्यावेळी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल हाेणारे सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन करत नसल्याचे समोर आले. दरम्यान, याठिकाणी थांबून असणारे नातेवाईकही मास्कचा वापर टाळत असल्याचे समोर आले. आरोग्य कर्मचारी मास्कचा वापर करत असले तरी त्यांच्याकडून रुग्णालयात थांबून राहणाऱ्यांना कामावर असलेल्या परिचारिका किंवा इतरांकडून समज देऊनही दुर्लक्ष केले जात आहे.

ओपीडी हाऊसफुल्ल

आजघडीस जिल्ह्यात तसेच शहरात किरकोळ आजारांची साथ सुरू आहे. यातून गोरगरीब नागरिक जिल्हा रुग्णालयात येत आहेत.

केसपेपर काढण्यासह इतर कामकाजांसाठी बाह्यरुग्ण विभागात गर्दी होत असल्याचे दिसून आले.

डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले

जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूसदृश ताप व मलेरियाचे रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. टायफाॅईडचेही रुग्ण येथे दाखल झाले होते.

जिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. याठिकाणी येणारे बहुतांश रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे ग्रामीण भागातून येतात. त्यांच्यात अद्यापही योग्य जागृती झालेली नसल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

कोरोना अद्यापही गेलेला नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सर्वांनाच मास्कचा वापर सक्तीचा आहे परंतु बऱ्याच वेळा सूचना करून लोक ऐकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. आरोग्य विभागाकडून सतत सूचना केल्या जात आहेत.

-डाॅ. के. डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आधी केसपेपर काढावा लागतो. याठिकाणी दरदिवशी मोठी गर्दी उसळते. दुपारी १२ वाजेपर्यंत ही गर्दी असते. याठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग टाळले जात असल्याचे समोर आले.

रुग्णालयात फेरफटका मारला असता, बहुतांश ठिकाणी महिला मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून आल्या. महिलांकडे मास्कही नसल्याचे समोर आले. रुग्णालयाने या महिलांना मास्क देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.