शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:48 IST

गंभीर : 31 डिसेंबर्पयत होती मुदत, केंद्रचालक व ग्रामसेवकांची चालढकल

नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण 595 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींकडून अद्याप ऑनलाईन पध्दतीने विकास आराखडा सादर करण्यात आलेले नाहीत़ संबंधित आराखडा सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2018 र्पयत अंतीम मुदत देण्यात आली होती़ संबंधित ग्रामपंचायतींनी लवकर आराखडा सादर करावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणा:या विविध निधींचे कशा प्रकारे विनियोग केला जाईल, कुठल्या कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल आदी विविध बाबींचा अहवाल ऑनलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी व नंतर जिल्हा परिषदेला सादर करावयाचे होत़े ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वितरीत करण्यात येत असतो़ या निधीच्या खर्चाचेही तपशील ग्रामपंचातींनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ परंतु या आदेशाकडे जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींकडून सफशेल दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे यातून दिसून येत आह़े ग्रामपंचायतींना हा अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देऊनही जवळपास सव्वा महिना झाल्यावरही हा अहवाल सादर करण्यात आला नाही़ अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक ग्रा़पं़चा समावेशदरम्यान, जिल्ह्यातील या 72 ग्रामपंचातींमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक 48 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े त्यानंतर धडगाव 20, शहादा 1 तर नवापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानुसार बहुतेक ग्रामपंचातींना अहवाल सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आल़े संकेतस्थळावर लॉगिन न होणे, पासवर्ड चुकीचा असणे आदी अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागत असल्याचे सांगण्यात आल़े प्रशासकीय आकडेवारीनुसार आतार्पयत 523 ग्रामपंचायतींनी आपले विकास आराखडे सादर केले असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले आह़े ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये पारदर्शका निर्माण व्हावी, तसेच गावात कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार याची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामविकास आराखडय़ाचे सादरीकरण करणे आवश्यक आह़े परंतु तरीदेखील बहुतेक ग्रामपंचायतींकडून विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आह़े  ग्रामविकास आराखडा ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रचालक व ग्रामसेवकांची आह़े परंतु त्यांच्याकडून अहवाल सादर करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांना पाठीशी न घालता लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आह़े आराखडय़ांतर्गत, अंगणवाडी, आरोग्य, पाणी मुलभूत विषयांवर काम होणे गरजेचे असत़े