शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आठ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवालाकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व रजाळे येथे नव्याने आढळलेल्या आठ कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व रजाळे येथे नव्याने आढळलेल्या आठ कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाळपर्यंत अपेक्षीत आहे. एकाच कुटूंबातील सहा जण बाधीत असल्याने या कुटूंबातील आणखी इतर जणांच्या स्वॅबचा रिपोर्ट काय येतो याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान, सिव्हीलमधील दोन कर्मचारी बाधीत झाल्याने येथेही मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे.रजाळे येथील एकाच कुटूंबातील सहाजण कोरोना बाधीत आढळले. या कुटूंबाच्या संपर्कातील आणि त्यांच्याच परिवारातील इतर सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सहा सदस्यांच्या संपर्कातील आणि सिव्हीलमधील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांचे स्वॅब घेवून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.रजाळेतील भिती कायमरजाळे येथील ग्रामस्थांमध्ये भिती कायम आहे. पॉझिटिव्ह असलेल्या या परिवारातील अनेकजण इतर ठिकाणी गेले आहेत. गावात देखील ठिकठिकाणी त्यांचा संपर्क आलेला आहे. त्यामुळे अशा संपर्कातील लोकांची भिती वाढली आहे. त्यांच्या स्वॅब रिपोर्टकडे आता लक्ष लागून आहे.गावात ध्यानीमनी नसतांना कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर त्याच कुटूंबातील इतर पाच रुग्ण आढळले. गावातील लोकांनी लॉकडाऊनच्या काळात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली होती. परंतु मुंबई रिटर्न या परिवारामुळे गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊनचे संपुर्ण पालन केले जात आहे. गावात बाहेरील कुठल्याही व्यक्तीला येवू दिले जात नाही.आरोग्य विभागातर्फे सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वेळोवेळी निर्जंंतुकीकरण देखील केले जात आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गावावर हे संकट ओढावल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. तरीही आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी गावकऱ्यांनी संकल्प केला आहे.नंदुरबारातील भोईगल्ली सीलशहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भोई गल्लीतील अनेक भाग सील करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधीत एक कर्मचारी या भागात राहतात. त्यामुळे हा परिसर निर्जूंतुकीकरण करून सील करण्यात आला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मुख्य रस्ता आणि इतर गल्लीबोळात बॅरीकेटींग लावण्यात आले आहे.संबधीत रुग्णाच्या संपर्कातील लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. हा भाग बाजार पट्टयातील असल्यामुळे व्यावसायिकांना देखील आता प्रतिबंधीत क्षेत्र असल्यामुळे व्यवसाय करता येणार नसल्याची स्थिती आहे.