शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ले सामाजिक चिंतेचा विषय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:48 IST

 मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा ...

 मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा किंवा धक्काबुकीच्या तीन घटना घडल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हवाच. त्यासाठी पोलिसांकडून कायद्याचा देखील धाक दाखविला जातोच. परंतु सध्या गुन्हेगारांचा पुळका असणा:या विविध संघटना, त्यांचे गल्लीबोळातील कार्यकर्ते लक्षात घेता पोलिसांकडून कुणाला मारहाण झाली, धाक दाखविला गेला तरी त्याचा जाब विचारणारे कमी नाहीत. मानव अधिकाराचा भंग झाल्याची ओरड केली जाते. न्यायालात देखील अशा बाबी आणल्या जातात.  काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील त्यात मागे नसतात. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी आपला धाक दाखविण्याचा प्रय} केला तर लागलीच खिशातील मोबाईल काढून त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून ती सोशल मिडियावर व्हायरल केली जाते. पोलिसांनी कशी दबंगगिरी केली, सर्व सामान्यांप्रती पोलिसांचा व्यवहार कसा याबाबत सोशलमिडियातील तज्ज्ञांना पुळका येतो. ही बाब लक्षात घेता आता पोलिसांनीही नरमाईचे धोरण स्विकारल्याचेच दिसून येते. परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीकडून पोलिसांवर हात उचलण्याचे, त्यांना धक्काबुकी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. नंदुरबार शहर व जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील घटना लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. शहरातील एका गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलीस महिला कर्मचा:याला एका युवकाकडून शिविगाळ व धक्काबुकी झाली होती. त्याची रितसर फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानंतर वादग्रस्त पोस्टर्स प्रकरण घडले. त्यानंतर मोलगी येथे कॉपी पुरविणा:यांकडून पोलिसाला मारहाण झाली. बुधवारी विसरवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचा:यांना जमावाकडून मारहाण झाली. त्यात तिघे पोलीस जखमी झाले. शिवाय पोलीस निरिक्षकांनाही धक्काबुकी करण्यात आली. या सर्व घटनांची फिर्याद दाखल झालेली आहेच. गुन्हेगारांना शिक्षाही होईलच. परंतु यामुळे पोलिस कर्मचा:यांचे मनोबल कमी होत आहे त्याकडे कोण पहाणार हे देखील लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक संजय पाटील हे पोलीस दलात विविध उपक्रम राबवून पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय} करीत आहेत. चांगले काम करणा:यांना लागलीच गौरविण्यात येत आहे. कर्मचा:यांसह त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य, खेळ, प्रशिक्षणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस दलात हे सर्व चांगले उपक्रम सुरू असतांना बाहेर मात्र, जनतेकडून पोलिसांना अपमानाची वागणूक सहन करावी लागत आहे. गुन्हेगारांवरील वचक निर्माण करून गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना आता आपला दंडुका बाहेर काढण्याची वेळ आली आहे. उठसूठ कुणीही यावे आणि पोलिसांवर हात उगारावा, त्यांना धक्काबुकी करावी ही बाब पोलिस दलाच्या दृष्टीने देखील नामुष्कीची ठरत आहे.