शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पोलिसांवरील हल्ले सामाजिक चिंतेचा विषय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:48 IST

 मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा ...

 मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा किंवा धक्काबुकीच्या तीन घटना घडल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हवाच. त्यासाठी पोलिसांकडून कायद्याचा देखील धाक दाखविला जातोच. परंतु सध्या गुन्हेगारांचा पुळका असणा:या विविध संघटना, त्यांचे गल्लीबोळातील कार्यकर्ते लक्षात घेता पोलिसांकडून कुणाला मारहाण झाली, धाक दाखविला गेला तरी त्याचा जाब विचारणारे कमी नाहीत. मानव अधिकाराचा भंग झाल्याची ओरड केली जाते. न्यायालात देखील अशा बाबी आणल्या जातात.  काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील त्यात मागे नसतात. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी आपला धाक दाखविण्याचा प्रय} केला तर लागलीच खिशातील मोबाईल काढून त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून ती सोशल मिडियावर व्हायरल केली जाते. पोलिसांनी कशी दबंगगिरी केली, सर्व सामान्यांप्रती पोलिसांचा व्यवहार कसा याबाबत सोशलमिडियातील तज्ज्ञांना पुळका येतो. ही बाब लक्षात घेता आता पोलिसांनीही नरमाईचे धोरण स्विकारल्याचेच दिसून येते. परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीकडून पोलिसांवर हात उचलण्याचे, त्यांना धक्काबुकी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. नंदुरबार शहर व जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील घटना लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. शहरातील एका गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलीस महिला कर्मचा:याला एका युवकाकडून शिविगाळ व धक्काबुकी झाली होती. त्याची रितसर फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानंतर वादग्रस्त पोस्टर्स प्रकरण घडले. त्यानंतर मोलगी येथे कॉपी पुरविणा:यांकडून पोलिसाला मारहाण झाली. बुधवारी विसरवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचा:यांना जमावाकडून मारहाण झाली. त्यात तिघे पोलीस जखमी झाले. शिवाय पोलीस निरिक्षकांनाही धक्काबुकी करण्यात आली. या सर्व घटनांची फिर्याद दाखल झालेली आहेच. गुन्हेगारांना शिक्षाही होईलच. परंतु यामुळे पोलिस कर्मचा:यांचे मनोबल कमी होत आहे त्याकडे कोण पहाणार हे देखील लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक संजय पाटील हे पोलीस दलात विविध उपक्रम राबवून पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय} करीत आहेत. चांगले काम करणा:यांना लागलीच गौरविण्यात येत आहे. कर्मचा:यांसह त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य, खेळ, प्रशिक्षणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस दलात हे सर्व चांगले उपक्रम सुरू असतांना बाहेर मात्र, जनतेकडून पोलिसांना अपमानाची वागणूक सहन करावी लागत आहे. गुन्हेगारांवरील वचक निर्माण करून गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना आता आपला दंडुका बाहेर काढण्याची वेळ आली आहे. उठसूठ कुणीही यावे आणि पोलिसांवर हात उगारावा, त्यांना धक्काबुकी करावी ही बाब पोलिस दलाच्या दृष्टीने देखील नामुष्कीची ठरत आहे.