शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘उलगुलान’ला दिलेले आश्वासन कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:51 IST

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा : मुख्य सचिवांनी लेखी देऊनही 33 हजार मंजूर दावेदारांना पट्टे नाही

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील वनजमीन धारकांच्या प्रश्नासह आदिवासींचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हजारो आदिवासींनी मुंबईत ‘उलगुलान’ मोर्चा काढला होता. या मोर्चाला मुख्य सचिवांनी लेखी आश्वासन देऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी त्याबाबत कार्यवाही नसल्याने आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लक्ष घालून प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन गतीमान करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महाराष्ट्रातील वनजमीन धारकांच्या प्रश्नासह आदिवासींच्या जीवन-मरणाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या 21 नोव्हेंबरला राज्यभरातील आदिवासींनी ठाण्यापासून 55 किलोमीटर पायपीट करीत विशाल ‘उलगुलान’ मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन मोर्चेक:यांसोबत तब्बल साडेचार तास चर्चा केली होती. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार कपील पाटील, आमदार विद्या चव्हाण तसेच मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासह विविध नऊ खात्यातील सचिव या वेळी उपस्थित होते. मोर्चेक:यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी मोर्चेक:यांना लेखी आश्वासने दिली होती. मात्र त्या लेखी आश्वासनापैकी एकाही आश्वासनाच्या कामाला गती न मिळाल्याने आदिवासींमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. विशेषत: राज्यातील वनजमिनीचा प्रश्न जनपक्षीय पद्धतीने पुढे गेलेला नाही. अजूनही जवळपास दोन लाख वनदावे प्रलंबित आहेत. जे 33 हजार दावे गेल्यावर्षी मंजूर केले त्यापैकी एकालाही अधिकृत वनपट्टा मिळालेला नाही. वास्तविक आंदोलनकत्र्याना जे लेखी आश्वासन देण्यात आले त्यात तिस:या क्रमांकावर मंजूर करण्यात आलेल्या पट्टय़ाच्या आधारे सातबारा देण्याची कार्यवाही त्वरित करावी तसेच जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून त्याचा पोटहिस्सा नमूद करून स्वतंत्र सातबारा देण्यात यावा, असे म्हटले आहे. परंतु या कामाला  महाराष्ट्रात कुठेही अजून सुरुवात झालेली नाही. ही प्रक्रिया न झाल्याने मंजूर दावेदारांनाही बँकेचे कर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहेत अशा शेतक:यांना दुष्काळ घोषित केल्यानंतर दिली जाणारी निविष्ठा अनुदानाची रक्कम त्वरित प्रदान करण्यात यावी, असे आश्वासन दिले आहे. परंतु त्यासंदर्भात अजूनही कार्यवाही होत नसल्याने यंदाच्या दुष्काळी स्थितीत आदिवासींना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे.  राज्यातील आदिवासींना देण्यात आलेल्या 581 कोटी रुपये खावटी कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण त्याबाबतही निर्णय झाला नाही. त्यामुळे दुष्काळाच्या स्थितीतही नवीन खावटी कर्ज मिळण्यास उशीर होत आहे. एकूणच आदिवासींच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन लेखी आश्वासने दिली असली तरी त्या आश्वासनाला महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटला असला तरी कार्यवाही सुरू झाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर लक्ष घालून संबंधित विभागांना आदेश करावेत व आश्वासनपूर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून आदिवासींना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.