शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

१५ दिवसात महामार्गाच्या दुरुस्तीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नेत्रांग ते शेवाळी या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नेत्रांग ते शेवाळी या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने १५ ते २० दिवसात कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने सोमावल ता़ तळोदा येथे २७ रोजी होणारा रस्तारोको स्थगित करण्यात आले आहे़ आमदार राजेश पाडवी व विभागाचे अभियंता कांकरिया यांच्या उपस्थितीत तळोदा पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते खापर दरम्याप पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने त्यांच्याकडून २७ रोजी सोमावल येथे नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ मार्गावर आतापर्यंत तीन ते चार जणांनी प्राण गमावले असून माजीमंत्री पद्माकर वळवी यांचे बंधू सुधाकर वळवी यांचाही खड्ड्यामुळे अपघात होऊन त्यांना दुखापत झाली होती़ यातून संतप्त नागरिकांनी संबधित विभागासोबत संपर्क करुनही दाद दिली जात नसल्याचे चित्र होते़ या प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेत आमदार राजेंद्र पाडवी यांनी रस्ते विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती़ यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली़ आमदार पाडवी व अभियंता कांकरीया यांच्या चर्चा झाल्यानंतर १५ दिवसात दुरुस्तीबाबत आश्वासन देण्यात आले़ आश्वानंतर सोमावल येथे होणारे आंदोजन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले़ यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, विरसिंग पाडवी, किरण सूर्यवंशी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, गोपी पावरा, प्रकाश वळवी आदी उपस्थित होते.आमदार राजेश पाडवी यांनी महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे महामार्ग दुरुस्ती बाबत संवाद साधला होता़ परंतू त्यावर संबधितांनी कारवाई न केल्याने आंदोलन पुकारण्यात आले होते़