शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वीज कनेक्शनअभावी आश्रमशाळा इमारत निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:08 IST

तळोदा एकात्मिक प्रकल्प : इमारत पूर्ण झाल्या पण वीज कनेक्शन नसल्याने हस्तांतरण रखडले

तळोदा : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील चार शासकीय आश्रमशाळांचे बांधकाम पूर्ण होवून साधारण तीन ते चार वर्षे झाली आहेत. तथापि या इमारतींना वीज कनेक्शन जोडले नसल्याने त्यांचे हस्तांतरणदेखील रखडले आहे. परिणामी येथील विद्याथ्र्याना भौतिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. निदान सलसाडी शाळेतील प्रकरणाची दखल घेवून आदिवासी विकास विभागाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा:या भांगरापाणी, बिजरी, होराफळी व तालंबा अशा चार शासकीय आश्रमशाळांच्या इमारतींच्या बांधकामास आदिवासी विकास विभागाने प्रत्येकी साडेतीन कोटी  अशा 14 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात सन 2010 पासून इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या मार्फत करण्यात आले. परंतु बांधकाम पूर्ण होऊन जवळपास तीन ते चार वर्षे झाली आहेत. असे असतांना केवळ विद्युत जोडणीअभावी इमारतींचे हस्तांतरणदेखील रखडले आहे. परिणामी कोटय़ावधी रूपये             शासनाने खर्च करूनही आदिवासी विद्याथ्र्याना पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागत आहे. वास्तविक इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संबंधीत विभागाने केवळ दोनच वर्षाची दिलेली असतांना आज आठ वर्षे झालेली आहेत. तरी देखील संबंधीत यंत्रणेच्या उदासिन धोरणामुळे आजही प्रकल्पाला ताब्यात मिळालेली नाही.  इमारतीच्या हस्तांतरणासाठी तळोदा प्रकल्पाने सनबंधितांकडे गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासून तगादा लावला आहे. आतादेखील त्यांना स्मरणपत्र पाठविले आहे. त्याचबरोबर या इमारती राहण्या योग्य आहेत की नाही याबाबतही शहादा बांधकाम विभाग व दक्षता गुणनियंत्रण विभागास लेखी कळविले आहे. त्याचाही खुलासा अद्याप देण्यात आला नसल्याचे प्रकल्पाचे म्हणणे आहे. आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने इमारतींच्या हस्तांतरणाबाबत मिळमिळीत भूमिका घेतल्यामुळेच संबंधीत यंत्रणा देत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. सलसाडी आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यूची घटना केवळ विजेचा शॉक लागून झालेली असतांना कनेक्शन जोडणीबाबत संबंधीत विभाग अजूनही ठोस कार्यवाही करायला तयार नाही. या प्रकरणी पालकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र नाराजीचा सूर असून, इमारतींचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ण करून हस्तांतरण करण्यासाठी संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात पालकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.