लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणा:या आशा कर्मचारींना आंदोलनादरम्यान पाणीच न मिळाल्याने त्यांचे हाल झाल़े या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या पाणीबाणीचा प्रकार उजेडात आला आह़े महिनाभरापासून सणउत्सवांमुळे सुटय़ांचा हंगाम असल्याने जिल्हा प्रशासनाचे कामकाज संथावले होत़े मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर येथे सकाळपासून निवेदनासह समस्या मांडणा:यांचे जत्थे दाखल झाले होत़े सोमवारचा लोकशाही दिन मंगळवारी आयोजित करण्यात आला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा शाखेकडून कार्यालयसमोर आंदोलन पुकारण्यात आले होत़े यामुळे आतील भागासह बाहेरही गर्दी झाली होती़ मोठय़ा संख्येने आलेल्या नागरिकांना दिवसभरात पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती़ विद्याथ्र्यासह, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही नाराजी बोलून दाखवली़ कार्यालयाच्या इमारतीतील चार वॉटर कुलर बंद असल्याने आशा स्वयंसेविका आणि त्यांनी सोबत आणलेल्या बालकांचे सर्वाधिक हाल झाले होत़े गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कार्यालयातील या पाणीबाणीबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात पाणीटंचाईसाठी कोटय़ावधी रुपये मंजूर करणा:या प्रशासनाकडून कार्यालयाच्या इमारतीमध्ये काम करणारे व भेटी देणा:यांसाठी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आह़े विशेष म्हणजे प्रशासनाने कर्मचा:यांच्या सोयीसाठी पाणीखरेदी गेल्या काही वर्षापासून सुरु केली आह़े यामुळे वॉटरकुलरकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आह़े येत्या काळात निवडणूकांमुळे येथे गर्दी वाढणार असल्याने प्रशासनाने पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े
टोकरतलाव रस्त्यावर उभारण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कूपनलिका करण्यात आली होती़ यातून कार्यालयातील स्वच्छतागृह, वॉटर प्युरीफायर आणि वॉटरकुलर यात पाणी पुरवठा करण्यात येतो़ कार्यालयातील दोन मजल्यांवर दोन्ही टोकाला चार वॉटर कूलर लावण्यात आले होत़े यातून येथे येणा:या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत होत़े परंतू गेल्या वर्षभरापासून हे चारही कूलर बंदावस्थेत पडून आहेत़ यावर मात करत प्रशासनाने कार्यालयीन कर्मचा:यांसाठी पाणी खरेदी करण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरु आह़े शहरापासून लांब असलेल्या या कार्यालयापासून लांब अंतरावरील नवापुर चौफुलीर्पयत विकतचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आह़े अंध, अपंग, लहान बालके, विद्यार्थी हे आतील कँटीनर्पयत जाण्यात असमर्थ ठरत आहेत़ याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आह़े एकीकडे पाण्याची समस्या असताना दुसरीकडे स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याचे समोर आले आह़े यामुळे महिला आणि पुरुष कर्मचारी सर्वाधिक त्रस्त आहेत़
मंगळवार हा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांचा वार ठरला़ तब्बल 12 नागरिकांच्या गटांनी समस्या निवेदनाद्वारे मांडून दाद मागितली आह़े यात वाल्मिक ऋषी महेत्तर समाज सकंल पंच सर्वागिण विकास समिती, जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना, अक्कलकुवा येथील विद्यार्थी यांच्यासह इतर नागरी गटांचा समावेश आह़े या सर्वाचे निवेदन स्विकारले गेले असले तरी पाण्यासह इतर समस्यांवर त्यांनी बोट ठेवले होत़े