शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा व तळोदा तालुक्यांत वीजपुरवठय़ाअभावी कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकल्याने महातिवरणकडून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आह़े त्यामुळे तळोदा तालुक्यातील लोभाणी, बुधावल, गोविंदमळ, सिव्रे भाबळुपुर, ङिारी तसेच शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आह़ेमहावितरणच्या शहादा उपविभागातील 302 ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठय़ाचे 18 कोटी 69 लाख रुपयांचे वीज बिल ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकल्याने महातिवरणकडून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आह़े त्यामुळे तळोदा तालुक्यातील लोभाणी, बुधावल, गोविंदमळ, सिव्रे भाबळुपुर, ङिारी तसेच शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आह़ेमहावितरणच्या शहादा उपविभागातील 302 ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठय़ाचे 18 कोटी 69 लाख रुपयांचे वीज बिल थकीत आह़े त्या गावाचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासह, शेती व जनावरांसाठीदेखील पाण्याचा           प्रश्न आता निर्माण झाला आह़े त्यामुळे परिसरातील शेतक:यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आह़े महावितरणकडून ऐन हंगामाच्या वेळी अशा प्रकारे           कारवाई करण्यात येत असल्याने सर्वसामान्य शेतक:यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे महावितरणने थकबाकी भरण्यास मुदत वाढ द्यावी अशीही मागणी आता जोर धरु लागली आह़े शहादा उपविभागाअंतर्गत शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव असे चार तालुके येतात़ महावितरणकडून 302 ग्रामपंचायतींना संबंधित गावांमधील टय़ुबवेल तसेच विहिरींना पाणीपुरवठय़ाचे कनेक्शन देण्यात आले आह़े परंतु 18 कोटी 69 लाखांचे वीज बिल थकीत असल्यामुळे वारंवार सूचनादेऊनही संबंधित ग्राहकांकडून वीज बिल भरण्यात येत नसल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली़ परिणामी शहादा तालुक्यातील मलोणी, मादा, तोरखेडा, वरुळ, पुसनद, खैरवे, अनरद, बामखेडा, नादरखेडा तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, कडुमटू, रामपूर, राजमोही, अमरकुवा आदी गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े आधीच परिसरात यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने पिक जगविण्यासाठी शेत:यांकडून पाण्यासाठी वणवण करण्यात येत आह़े त्यातच आता महावितरणकडून वीजपुरवठाही खंडीत करण्यात आल्याने शेतक:यांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याचे सांगण्यात येत आह़े थकबाकी भरण्यास ग्रामपंचायतींमध्ये ठणठणाटथकबाकीबाबत सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी व जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वळवी, तालुका सरपंच संघटनेचे सल्लागार जयसिंग माळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व घरपट्टीतून मिळणारा ग्रामनिधी हा ग्रामपंचायत पाणीपुरवठा अधिकारी, सफाई कर्मचारी, विकासकामे, कृषीपंप दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, विविध योजना आदी कामांमध्ये खर्च होत असतो़ त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे वीज बिल भरण्यास ग्रामपंचातींमध्ये ठणठणाट असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठय़ाचे बिल भरण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातून स्वतंत्र निधीची तरतुद करण्यात यावी अशीही मागणी आता जोर धरु लागली आह़े दरम्यान, महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यात येत आह़े व संबंधितांनी त्वरीत थकबाकी भरावी हे आवाहनही करण्यात येत आह़े परंतु ऐवढी मोठी रक्कम भरण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी भरण्यासाठी अजून वेळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात ेयेत आह़े त्यामुळे या मागणीकडे महावितरण लक्ष देणार काय हा प्रश्न निर्माण होत आह़े