शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार व वाहतुकदारांकडून कृत्रीम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील ठेकेदार आणि वाळू वाहतूकदार यांच्या संगनमतामुळे कृत्रीत वाळू टंचाई करून भाव वाढविल्यामुळे जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधील ठेकेदार आणि वाळू वाहतूकदार यांच्या संगनमतामुळे कृत्रीत वाळू टंचाई करून भाव वाढविल्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात वाळू टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे गुजरातमधील वाळू ठेक्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.   वाळूचा आगार म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जाते. तापी नदीवरील तब्बल 16 ते 18 वाळू घाट असून इतर लहान मोठय़ा नद्यांवरील वाळू घाट मिळून ही संख्या 20 पेक्षा अधीक जाते. तापीच्या वाळूला असलेली मागणी लक्षात घेता वाळूचे अर्थकारण मोठे असते. अनेकांच्या कमाईचे आणि पोट भरण्याचे साधन वाळू ठेके असतात. पर्यावरणाचे कोणतेही नियम, कायदे न पाळता अमर्याद वाळू उपसा केला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून जिल्हा प्रशासनाने तापीवरील दोन ते तीन घाट लिलाव करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे वाळूतून होणा:या काळ्या कमाईला मोठा ब्रेक बसला आहे. यंदा मात्र, वाळू घाट लिलाव प्रक्रिया उशीराने सुरू होत असल्यामुळे गुजरातमधील वाळू उपशावरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी वाळू लॉबीने कृत्रीम टंचाई निर्माण करण्याचा प्रय} करून वाळूचे भाव वाढविण्यास सुरुवात केली  आहे. जिल्ह्यात वाळूचा उपसाच नाहीदोन ते तीन वर्षापासून जिल्ह्यातील वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने अंकुश आणला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात हद्दीतील वाळू उपशावरच जिल्ह्यातील वाळू ठेकेदार, वाहतूकदार यांना अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी गुजरात व महाराष्ट्रातील वाळू ठेकेदारांची लॉबी तयार होऊन ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. जिल्हा प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्षवाळू घाट ठरवितांना आणि त्यांचा लिलाव करतांना पर्यावरणाच्या नियमांना धरूनच ते करावे लागते. परंतु प्रशासन आणि वाळू ठेकेदार त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतात. अक्षरश: नदीचे वस्त्रहरण केले जात असते. यंदा सर्वच नदी, नाले  अद्यापही प्रवाही आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वाळू यंदा नदीपात्रात उपलब्ध आहे. त्यामुळे वाळू लिलाव करतांना पर्यावरण नियम आणि कायद्यांचे तंतोतंत पालन करूनच प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.गावांचा विरोधज्या गावाच्या क्षेत्रातील नदीपात्रात वाळू घाट ठरविला जातो व लिलाव केला जातो त्या गावांचा मात्र त्याला विरोध असतो. मर्यादेपेक्षा अधीक उपसा, भार क्षमतेपेक्षा अधीक वाळू वाहतूक करणारे वाहने यामुळे रस्त्यांची वाट लागते. संबधीत गावांच्या जमिनीतील पाणी पातळीवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी अनेक गावे ग्रामसभेत ठराव करून वाळू घाट लिलावास विरोध करतात. जिल्हा बदनामअवैध उपसा आणि काळा बाजार यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवण्यासाठी आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे. दोन वर्षापूर्वी जिल्हा या बाबत बदनाम झाला होता. खोटय़ा पावत्यांच्या आधारे वाळू वाहतूक केल्या प्रकरणी थेट ठाणे जिल्ह्यातील पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.शिवाय नंदुरबार तालुक्यात मॅजीक पेनच्या सहाय्याने एकाच पावतीद्वारे अनेकवेळा वाळू उपसा करण्याचे प्रकारही उघड झाले होते. यावेळी तसे होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन काय आणि कशी उपाययोजना करेल याकडे आता लक्ष लागून आहे.

गुजरातमधील ठेकेदार हे टन नुसार वाळू विक्री करतात पाच टन वाळूचा एक ब्रास असतो. महाराष्ट्रात मात्र वाळू ग्राहक हे ब्रासनिहाय वाळू खरेदी करतात. सध्या 450 रुपये टन अर्थात 2,250 रुपये ब्रास दराने वाळू विक्री होत आहे. येत्या काळात भाव वाढविण्यासाठी आता कृत्रीम टंचाईचा प्रयत्न सुरू झाला आहे. जर जिल्ह्यातील वाळू घाट सुरू झाले तर भाव घसरतील हे तेवढेच खरे आहे. परंतु जिल्ह्यातील वाळू घाट सुरू होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व प्रकारामुळे वाळू वाहतूक करणा:यांचेही फावले आहे. अव्वाच्या सव्वा दरात आणि क्षमतेपेक्षा अधीक वाळू वाहतूक केली जात आहे.  जिल्ह्यात 50 पेक्षा अधीक वाळू वाहतूक करणारे वाहनधारक आहेत. नंदुरबार तालुका- सावळदा, बोराळे, सुजालपूर, कोपर्ली, अमळथे, नाशिंदे, ओसर्ली, आराळे.शहादा तालुका- बामखेडा तर्फे सारंगखेडा, देऊर-कमखेडा, खैरवे-भडगाव, फेस, दोंदवाडा, तोरखेडा. याशिवाय रंगावली, सरपणी, गोमाई या नद्यांवरही वाळू घाटला परवाणगी असते.