शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

ब्राह्मणपुरीत कानुबाईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुमातेचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. चौरंगावर कानुमातेची स्थापना केली जाते. त्यासाठी केळीचे खांब, ...

दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुमातेचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. चौरंगावर कानुमातेची स्थापना केली जाते. त्यासाठी केळीचे खांब, विड्याचे पान, सुपारी, नारळ, ओटी आदी साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी दिसून आली. देवीसमोर पाच फळांचे नवैद्य ठेवण्यात येते. त्यामुळे फळांनाही मागणी होती. ब्राह्मणपुरी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकमताने हा उत्सव साजरा करण्याचे ठरले. या उत्सवामुळे गावात एकोपा निर्माण होतो. यालाच कानबाई मातेचा रोट म्हणतात. ज्या घरात कानुबाईची स्थापना केली जाते अशा सर्व कुटुंबात रोट तयार केले जातात. या उत्सवासाठी गावातील बाहेरगावी गेलेली मंडळी गावात येतात. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो. कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचे रुप दिल जाते. त्याला अलंकारांनी सजविले जाते. कानुमातेची उत्साहात पूजा केली जाते. रविवारी स्थापन होणाऱ्या कानुबाईचे ब्राह्मणपुरी येथे थाटात आगमन झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी कुटुंबातील सदस्य घेताना दिसून येत आहेत.

रात्री अहिराणी गीतांसह जागर

खान्देशचे ग्रामदैवत कानुमातेची उत्साहात स्थापना झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य, परिसरातील महिला रात्रभर अहिराणी भाषेतील गाणी म्हणतात. या उत्सवासाठी ‘रोट’चा प्रसाद तयार करण्यात येतो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ग्रहण करतात. अत्यंत पवित्र समजला जाणारा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.