शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

नवापूर तालुक्यात ५६ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

नवापूर तालुक्यात वर्षभरातून घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांकडे १६ कोटी थकबाकी आहे तर कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी ...

नवापूर तालुक्यात वर्षभरातून घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांकडे १६ कोटी थकबाकी आहे तर कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी असून, यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

वीज बिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वेळेवर बिले नाही भरली तर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कृषी ग्राहकांकडे ४० कोटी रुपये थकबाकी असल्याने शेतकऱ्यांनी कृषी बिल भरल्यास ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती नवापूर येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांनी दिली आहे. नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना कृषी वीज बिल वसुलीचे अधिकार देण्यात येतील. त्यातून ग्रामपंचायतीला बिले वसूल करून दिली तर एका बिल पावतीचे पाच रुपये दिले जाणार आहेत. तसेच थकबाकीदाराच्या रकमेमधून १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वीज वितरण कंपनीला वीज बिल वसूल करण्यास मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना अंदाजे बिल देण्याचे बंद करावे. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावरदेखील वीज वितरण कंपनीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली.