शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी करणार व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्ग, राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी व मजुरांच्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभाग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महामार्ग, राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी व मजुरांच्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिल्या आहेत.कोविड-१९ आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हाबंदी लागू झाल्यानंतर कामासाठी स्थलांतर करून आलेले कामगार आपल्या राज्यात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच बरेचसे कामगार जिल्ह्यातील विविध भागात अडकले असल्याने त्यांच्या उपजीविकेची आणि निवाºयाची समस्या निर्माण झाली आहे. सीमा भागातील अशा स्थलांतरीत कामगारांना अलगीकरणामध्ये ठेऊन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करावे. गरोदर माता/बालके यांची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यांना कोविड-१९ प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती द्यावी. आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करावे. अशा कामगारांच्या व्यवस्थेसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात अडकलेल्या बाहेरगावातील कामगारांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून अशा कामगारांनी गर्दीने प्रवास करू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. संचारबंदीच्या काळात मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करू इच्छिणाºया व्यक्ती आणि संस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अधिकृत ठिकाणीच मदतीची रक्कम किंवा वस्तू देण्यात याव्यात, असेही डॉ.भारुड यांनी कळविले आहे.जीवनावश्यक वस्तूंचे वाटपजिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शाळांना सुटी देण्यात आली असल्याने शिल्लक असलेली अंडी आणि दुधाच्या टेट्रापॅकची माहिती संकलीत करण्यात आली असून त्याचे गरजूंना वाटप करण्यात येत आहे. नंदुरबार येथे आलेल्या ९० मजूरांना याचे वाटप करण्यात आले असून मागणीनुसार साठा असेपर्यंत हे वाटप सुरू राहणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. शहादा उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी समाजमाध्यमाद्वारे विविध संस्थाना ४-५ दिवस उपयोगात येईल अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याचे आवाहन केले आहे. त्यात ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, १ किलो सोयाबीन तेल, १ किलो साखर, २०० ग्रॅम चहा, चटणी, हळद, साबण अशा साधारण ५०० रुपये किंमतीच्या वस्तूंचा समावेश आहे. टाटा ट्रस्ट आणि खिदमत फाऊंडेशनने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून ट्रस्टच्या सिनी उपक्रमाच्या माध्यमातून १७०० कीट उपलब्ध होणार आहेत. तर खिदमत फाऊंडेशनमार्फत ३०० कीट उपलब्ध होणार आहेत. गरजेनुसार अधिक कीट उपलब्ध करून देण्याची तयारी दोन्ही संस्थांनी दर्शविली आहे. आपत्तीकाळात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी लक्ष्मण कोळी (८३२९८१७०३३), संदिप टेंभेकर (८६६९१३२७२३) किंवा चेतन गांगुर्डे (८२७५५६३९३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गिरासे यांनी केले आहे.नंदुरबार तालुक्यात स्त्रीशक्ती संस्था, सिंधी युवक मित्र मंडळ, चंदुभैय्या मित्र मंडळातर्फेदेखील भोजन व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. युवारंग प्रतिष्ठानतर्फे बंदोबस्ताससाठी तैनात पोलीस आणि इतर कर्मचाºयांना चहा, नाश्ता व भोजनाचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय विविध संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दानशूर व्यक्तींनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.