शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी करणार व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्ग, राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी व मजुरांच्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभाग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महामार्ग, राज्यमार्गावरून जाणाऱ्या प्रवाशी व मजुरांच्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिल्या आहेत.कोविड-१९ आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हाबंदी लागू झाल्यानंतर कामासाठी स्थलांतर करून आलेले कामगार आपल्या राज्यात परतण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच बरेचसे कामगार जिल्ह्यातील विविध भागात अडकले असल्याने त्यांच्या उपजीविकेची आणि निवाºयाची समस्या निर्माण झाली आहे. सीमा भागातील अशा स्थलांतरीत कामगारांना अलगीकरणामध्ये ठेऊन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करावे. गरोदर माता/बालके यांची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यांना कोविड-१९ प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती द्यावी. आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करावे. अशा कामगारांच्या व्यवस्थेसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात अडकलेल्या बाहेरगावातील कामगारांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून अशा कामगारांनी गर्दीने प्रवास करू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. संचारबंदीच्या काळात मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करू इच्छिणाºया व्यक्ती आणि संस्थांनी प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अधिकृत ठिकाणीच मदतीची रक्कम किंवा वस्तू देण्यात याव्यात, असेही डॉ.भारुड यांनी कळविले आहे.जीवनावश्यक वस्तूंचे वाटपजिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शाळांना सुटी देण्यात आली असल्याने शिल्लक असलेली अंडी आणि दुधाच्या टेट्रापॅकची माहिती संकलीत करण्यात आली असून त्याचे गरजूंना वाटप करण्यात येत आहे. नंदुरबार येथे आलेल्या ९० मजूरांना याचे वाटप करण्यात आले असून मागणीनुसार साठा असेपर्यंत हे वाटप सुरू राहणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. शहादा उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी समाजमाध्यमाद्वारे विविध संस्थाना ४-५ दिवस उपयोगात येईल अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याचे आवाहन केले आहे. त्यात ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, १ किलो सोयाबीन तेल, १ किलो साखर, २०० ग्रॅम चहा, चटणी, हळद, साबण अशा साधारण ५०० रुपये किंमतीच्या वस्तूंचा समावेश आहे. टाटा ट्रस्ट आणि खिदमत फाऊंडेशनने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून ट्रस्टच्या सिनी उपक्रमाच्या माध्यमातून १७०० कीट उपलब्ध होणार आहेत. तर खिदमत फाऊंडेशनमार्फत ३०० कीट उपलब्ध होणार आहेत. गरजेनुसार अधिक कीट उपलब्ध करून देण्याची तयारी दोन्ही संस्थांनी दर्शविली आहे. आपत्तीकाळात मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी लक्ष्मण कोळी (८३२९८१७०३३), संदिप टेंभेकर (८६६९१३२७२३) किंवा चेतन गांगुर्डे (८२७५५६३९३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गिरासे यांनी केले आहे.नंदुरबार तालुक्यात स्त्रीशक्ती संस्था, सिंधी युवक मित्र मंडळ, चंदुभैय्या मित्र मंडळातर्फेदेखील भोजन व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. युवारंग प्रतिष्ठानतर्फे बंदोबस्ताससाठी तैनात पोलीस आणि इतर कर्मचाºयांना चहा, नाश्ता व भोजनाचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय विविध संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दानशूर व्यक्तींनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.