शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
4
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
5
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
7
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
9
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
10
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
11
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
12
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
13
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
14
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
15
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
16
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
17
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
18
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
19
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
20
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांतील आमचूर प्रकल्पाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांत आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महामंडळामार्फत वन धन केंद्र आणि महिला ग्राम संघामार्फत हा ...

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांत आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महामंडळामार्फत वन धन केंद्र आणि महिला ग्राम संघामार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे. या दोन्ही तालुक्यांत तयार होणाऱ्या आमचूराला त्याच्या विशिष्ट गुणवत्तेमुळे देशांतर्गत आणि देशाबाहेर मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. परंतु या संधीचा फायदा व्यापारी आणि आमचूर प्रक्रिया उद्योगाधारीत कंपन्या घेतात.

आदिवासी बांधवांना या व्यवसायाचा लाभ होण्यासाठी स्थानिक पातळीवर आमचूर निर्मिती आणि विक्री होणे गरजेचे आहे. म्हणूनच ॲड. पाडवी आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी धडगाव आणि अक्कलकुवा परिसरात असे केंद्र विकसित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते.

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांत आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात असून दुर्गम-डोंगराळ भागातील नागरिकांसाठी आमचूर तयार करणे हे उपजिविकेचे महत्त्वाचे साधन आहे. कच्च्या स्वरुपात तयार झालेले हे आमचूर बाहेरील राज्यातील व्यावसायिक विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. स्थानिक स्तरावर प्रक्रिया व विक्री केंद्र झाल्याने आमचूराला चांगला दर मिळून आदिवासी कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागालादेखील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा तसेच इतर उत्पन्न देणाऱ्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश दिले आहेत. डोंगराळ भागात फळझाडांचे आच्छादन करून पर्यावरण संरक्षणासोबत आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढवून त्यांचे स्थलांतर कमी व्हावे यादृष्टीने पालकमंत्री ॲड. पाडवी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आमचूर निर्मिती व विक्री केंद्राला शासनाने मान्यता दिली आहे.

मानव विकास मिशन अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यापूर्वी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचे आधारभूत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प राबविल्यानंतर त्याची उपयुक्ततादेखील सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासण्यात येणार आहे.

अशी असेल योजना....

व्यक्तिगत लाभार्थी, आदिवासी समाज, संस्था यांचा प्रकल्पाला १० टक्के स्वनिधी असेल, तर ९० टक्के शासनाचा हिस्सा असेल. ६ कोटी ५ लाखांच्या प्रकल्पासाठी ५ कोटी ४४ लक्ष ५० हजार एवढ्या शासनाच्या हिश्शास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ६० लक्ष ५० हजार स्वनिधीतून गोळा होईल. त्यापैकी आमचूर खरेदीसाठी दोन कोटी खेळते भांडवल, आमचूर उत्पादनासाठी अर्थसहाय्य ६० लाख, आमचूर प्रक्रिया, विक्री व वाळविणे यासाठी दोन कोटी, ग्रामीण स्तरावर साठवणुकीसाठी वन धन केंद्र किंवा ग्राम संघ यांना १० लाख, आदिवासी कुटुंबातील सदस्यांना स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचूरावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ८० लाख आणि ५५ लाख रुपये व्यवस्थापन खर्च असेल.

विविध उपयोजनांचा समावेश

ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांना आमचूर खरेदीसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून ४०० क्विंटलपर्यंत आमचूर खरेदी करून स्थानिक ठिकणी उपलब्ध शीतगृहात साठवणूक करण्यात येईल.

चांगल्या प्रतीचे आमचूर खरेदी करण्यासाठी ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांतील सभासदांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एक ग्राम संघ किंवा वन धन केंद्रातील ३०० आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांतील सभासदांना आमचूर वाळविणे व त्यावर प्रक्रिया करून विक्री करणे यासाठी सहाय्य करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यात अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांतील १० ग्रामसंघ/वन धन केंद्रांना डीबीटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांना आमचूराची साठवणूक करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांतील १० ग्रामसंघ/वन धन केंद्रांना प्रत्येकी १ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

आदिवासी कुटुंबातील सदस्यांसाठी स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचूरावर प्रक्रिया याबाबत प्रशिक्षण देणे अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ३०० सभासदांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आमचूर निर्मिती व विक्री केंद्राचा प्रकल्प दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांसाठी वरदान ठरणार आहे. या भागात होणारा पारंपरिक आमचूर व्यवसाय वाढविण्यासाठी आणि त्याद्वारे सामान्य आदिवासी नागरिकांचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होऊन त्याचा आदिवासी बांधवांना लाभ व्हावा, असा प्रयत्न असेल.

-ॲड. के. सी. पाडवी, पालकमंत्री नंदुरबार जिल्हा